“ जेव्हा तुम्ही आर्मीत रुजू होता, तुम्हाला देशासाठी तुमचं जीवन समर्पित करण्यास सांगितले जाते. ही एक मोठी शपथ आहे.” – मिशेल विंटल
अनेकांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि सर्वांच्या सन्मानार्थ.
आपला देश जगावा यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणा-या सैनिकांप्रती नतमस्तक होण्याची वेळ आली आहे. ज्यांनी कधी विचारच केला नाही की आपण मागे काय सोडून आलो आहोत. निस्वार्थ भावनेने युद्धात लढता कारण आम्ही सुरक्षित रहावं…
स्टोरीमिरर आपणास आमंत्रित करत आहे आपल्या आयुष्यातील या ख-या हिरोंबद्दल लिहून त्यांच्याप्रती सन्मान, प्रेम, आदर व्यक्त करण्यासाठी !!
चला तर मग एकत्र येऊन त्यांच्या कर्तृत्वाच्या कथा अजरामर करूया…
कारण आपण त्यांचं देणं लागतो….
१. कवितेसाठी शब्द मर्यादा कमीतकमी १० शब्द
२. कथेसाठी शब्द मर्यादा कमीतकमी ५० शब्द
३. प्रस्तुत कथा आणि कविता ही लेखक / कवीची स्वरचना असावी.
४. १ ऑगस्ट २०१८ ते १५ सप्टेंबर २०१८ या कालावधीत पाठवलेल्या साहित्याचाच (कथा आणि कविता) स्विकार केला जाईल.
५. स्पर्धेसाठीचा विषय आहे ‘ सलाम सैनिक हो ‘… जे साहित्य या विषयावर आधारित नसेल त्याचा स्विकार केला जाणार नाही.
६. या स्पर्धेचा उद्देश हा सैनिकांप्रती नतमस्तक होणे, आदर सन्मान व्यक्त करणे हा आहे. त्यामुळे कथा आणि कविता यात सकारात्मकता व सद्भावनाच असणं आवश्यक आहे.
७. विजेत्यांचा निर्णय हा संपादकांनी दिलेले गुण + https://storymirror.com वर साहित्याला मिळालेले लाईक्स तसेच व्ह्यूजची संख्या यावर घेतला जाईल.
८. स्पर्धेचा निकाल ३० सप्टेंबर २०१८ रोजी घोषित केला जाईल.
९. स्पर्धेसाठीचे सर्व साहित्य https://contest.storymirror.com/ येथेच पाठवणे आवश्यक आहे, अन्यथा साहित्य अपात्र ठरवण्यात येईल.
१०. स्टोरीमिररतर्फे घेण्यात येणारा निर्णय हा अंतिम व स्पर्धकांसाठी बंधनकारक असेल.
१. सर्वोत्कृष्ट २० कथा व सर्वोत्कृष्ट ३० कवितांचे एकत्रित संकलन करून त्याचे सदर भाषेत ईबुक प्रकाशित करण्यात येईल.
२. सर्वोत्कृष्ट ५ साहित्यांना सर्टिफिकेटस देण्यात येतील.
स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे