महाराष्ट्र दिन हा महत्वाचा दिवस आहे जो महाराष्ट्र राज्याचे स्थापनेचा दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस 1 मे रोजी साजरा केला जातो.
महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात अनेक महत्वाचे घटने आणि व्यक्तिचे सहभाग आहेत.महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. एका वेगळ्या संस्कृतीच्या वाटेवर असलेल्या महाराष्ट्राला नेहमीच अप्रतिम अस्तित्व आहे.
येथे विविध जातीचे लोक राहतात आणि त्यांची संस्कृती महाराष्ट्राला एक अनोळखी दिशा देते.
महाराष्ट्र दिनाच्या अवसराला समर्पित स्टोरीमिरर घेऊन आली आहे "गर्जा महाराष्ट्र माझा" लेखन स्पर्धा। जिथे तुम्ही राज्याच्या इतिहास, संस्कृती, बोलीभाषेतील विविधता, कला आणि समाजाविषयक मुद्द्यांच्या विषयावर कथा कविता लिहू शकता.
स्पर्धेचे नियम -
१.ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.
२. सहभागी स्पर्धकांनी त्यांच्या स्वलिखित कथा,कविता सादर केल्या पाहिजेत.
३. आधीच्या स्पर्धेसाठी सबमिट केलेल्या कथा,कविता पुन्हा या स्पर्धेसाठी सबमिट करू नये
४. सहभागी स्पर्धक एकापेक्षा अधिक कथा,कविता देखील सादर करु शकतात शब्दांचे बंधन नाही.
५. इतर कोणत्याही कवी किंवा लेखकाचे लेखन कॉपी केल्याचे आढळल्यास ते स्टोरीमिरच्या पोर्टल वरून डिलिट करण्यात येईल.
६. तुमची कथा कविता कोणत्याही प्रकारची राजकीय किंवा कोणत्याही धार्मिक समाजाच्या भावना दुखावणारी नसावी याकडे विशेष लक्ष द्यावे.
७. स्पर्धेसाठी एकदा सबमिट केलेले साहित्य स्टोरीमिररच्या प्लॅटफॉर्मवरून काढून घेता येणार नाही.
८. संपादकीय गुणांच्या आधारे विजेत्यांचा निर्णय घेतला जाईल स्टोरीमिरर ने घेतला निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल.
साहित्य प्रकार : कथा,कविता
साहित्य सादर करण्याचा कालावधी: दि : ३० एप्रिल ते १४ मे २०२३
बक्षीस
* सर्वोत्कृष्ट ३ कथा, व ३ कविता, संपादकीय गुणांनुसार विजेत्या म्हणून घोषित केल्या जातील आणि बक्षीस म्हणून डिजिटल विजेते प्रमाणपत्रा सोबत, ₹२५० चे स्टोरीमिरर शॉप व्हाउचर देखील दिले जाईल.
* सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र मिळेल.
निकाल - ३१ मे २०२३
संपर्क: रोशन मस्के.(स्टोरीमिरर मराठी हेड)
मो : ९७६८०६५७६३.