दुष्काळ
दुष्काळ
जेव्हा कोपला निसर्ग
तेव्हा पडला दुष्काळ,
कशी आली आम्हांवर
किती वाईटही वेळ.
पाण्यासाठी वणवण
करी सारे पायपीट,
किती दमलो शिणलो
नाही सरतच वाट.
चा-यासाठी गोठ्यामधी
गुरं- ढोरं हंबरती,
फरपट जीवनाची
डोळे अश्रुने भरती.
शेतं पडली ओसाड
पिक नाही शिवारात,
झुरतोय बळीराजा
पोरं उपाशी घरात.
हाल सोसवेना आता
कसं सुटणारं कोडं,
घालतोयं तो आशेनं
देवालाच रे साकडं.