जिंकलं कुणीच नाही...
जिंकलं कुणीच नाही...
अचानक उसळलेली गर्दी
एकाच पुलावर शेकडो लोक
एकाच वेळी
आणि एकाच मिनिटाचा तो थरार
सारे काही डोळ्यांच्या समोर घडत होते
अचानक काय सुरू झाला पाऊस
आणि घेतला जीव
बहिणीचा भावाचा बाबांचा
आणि कुणाच्या आईचा
चूक होती का पावसाची?
नेहमीचाच तो
पण भयंकर घाबरवलं त्यावेळी
त्याच्या त्या रौद्र रूपाने
ओरडलं कुणीतरी भीतीने
कोसळला रे पूल
अफवा होती फक्त
आणि भीती आपला जीव गमावण्याची
सगळे धावले जीव मुठीत घेऊन
पण जिंकलं कुणीच नाही
भीतीने भीतीचा बळी घेतला