कारण आहे
कारण आहे
जगी जे कार्य घडते
घडण्याला कारण आहे
शेतकरी आत्महत्या करतात
त्या आत्महेलाही कारण आहे... !
सरकारचं म्हणणं असं आहे
राब शेतकरी बैला
तू दिवस-रात्र राब
तुला शेतीत राबून पेरणेच आहे
तुझ्या त्या पेरणीतच
खरं कारण आहे...!
शेतकरी म्हणून जन्माला आलास
तर तुला शेती करनेच आहे
डोक्यावर कर्जाचे डोंगर घेऊन
तुला शेतातच गळफास घेऊन
एक ना एक दिवस
शेवटी तुला मरणेच आहे...!
सरकार शेतकर्यांवरती गरजते
पण पण धनींकावरती बरसते
शेतक-यांना आत्महत्या करण्यास
कधी काळी मजबूरही करतो
मार्शल त्यालाही काही कारण आहे.....!