माणूसकी
माणूसकी
कुठे गेली नाती सगळी ,कुठे गेले मित्र
दिसे नसे झाले सगळे, पसरला काळोख सर्वत्र ..
नियती चा हा खेळ अजब, नाही कधी कळला ..
अनेक योनी पार करून तो माणूस म्हणून जन्मला
एकटाच ह्या जगात आला आणि एकटाच गेला
सगळं काही कमावूनहि रिकाम्या हाती परतला ....
प्रेम भावना,सहानभूती आणि माणुसकी हि
जन्मतः च त्याला मिळाली ,
पण रोजच्या व्यवहारात त्याची महती नाही कळली ..
क्षणात होत्याचं नव्हतं झाले होते जेव्हा,
दोन हात माणुसकीचे जीवदान देऊन गेले तेव्हा..