विरहातल्या भावना
विरहातल्या भावना
बंधनात किती राहू
सर्व जीवन हुरपळून निघाले,
प्रियकराच्या सतत ओढीने
माझीच मी आता न राहिले.
गाडा संसाराचा खूप
पश्चतापाणे ओढते,
दुरावलेले नाते सख्या
अंतर मनाने जोडते.
नावं ठेवू नको तूझ्या काळीला
एक काळा म्हणी तुझ्या नावाचा घालते,
निराश होऊन खचू नको आयुष्यात
एकदा का होईना तुझ्या माघे माघे चालते.
शब्दात कधी न व्यक्त होईल
एवढं आजही प्रेम मी करते,
आतल्या आताच झिजून
तुझ्या नावाचं जोडवं
माझ्या पाई घालते.
नशिबात तू नाहीस माझ्या
पण,भाळी कुंकू तुझंच लावते,
तुझ्या पदरी पडलेल्या आगीचे
रोहना मीही ईस्तव विचिते...