मुलगी शाप नाही
मुलगी शाप नाही
मुलगी म्हणजे सौभाग्य, चैतन्य, संस्कृती, माया, प्रेम, वात्सल्य, मुलगी म्हणजे लक्ष्मी. २१ व्या शतकात सुद्धा आजुन काही ठिकाणी मुलगी नको असे लोक आहेत. हे दुर्दैवच म्हणावे लागेल. कल्पना, सुनीता विल्यम्स ह्या चंद्रावर जाऊन आल्या हे अभिमानाने सांगतो,आज प्रत्येक क्षेत्रता मुली आपला डंका वाजतना दिसतात. पण मुलगी झाली म्हणून तिला वाऱ्यावर सोडून देणारे सुद्धा आजुन आहेत. मुलगा किंवा मुलगी हे स्त्री च्या हातात नसत. तरी पण त्या लहान जीवाला आपल्या आई पासून दूर केलं जातं.
त्या लहान जीवाला आपल्या साठी काय चांगलं काय वाईट हे सुद्धा कळत नाही.त्या लहान जीवाला असं वाऱ्यावर सोडून जाताना काहीच वाटत नसेल का? बाळाची चाहूल लगल्यापासून तर, जन्माला येई पर्यंत आई आपल्या पिल्ला बद्दल स्वप्न पाहत आसते आणि जर मुलगी झाली तर,तिला माहितीही नसत.आणि तिच्या स्वप्नना प्रमाणे त्या मुलीला हि कचऱ्यात टाकल जातं. रक्षाबंधनाला, भाऊबीजेला बहीण पहिजे पण,तीच जर मुलगी झाली तर नको आसते असं का?
आपल्या घरात दिवा ऐवजी पणती झाली तर ती.नको असते. अस का मुलगी घरच चैतन्य असते.मुलगी जन्म असते.मुलगी श्वास आहे. मुलीला आज तुम्ही जगवा,उडायला ती तुम्हांला जगवेल. मुलगी ममतेचं प्रतीक आहे.ती कन्या दान आहे.आईची आत्मा आहे.जगाची, घरांची, समाजाची, शान आहे, अभिमान आहे. मुलगी शाप नाही, वरदान आहे.मुलगी महालक्ष्मी, सरस्वती, दुर्गा ,चेंडी, महाकाली आहे.तिला जीवन द्या.