Aarti Ayachit

Inspirational Others

3  

Aarti Ayachit

Inspirational Others

"आश्चर्यकारक प्रेमाचे रंग"

"आश्चर्यकारक प्रेमाचे रंग"

7 mins
391


प्रतीक पुन्हा एकटाच जुन्या आयुष्याबद्दल विचार करत बसला होता, आई सुरेखा शिक्षिका होती, म्हणून ती त्याला नेहमीच सकारात्मक विचार करायला सांगायची "कारण ज्या वेळी फक्त आपल्या आयुष्यात ऊन-पावसाची ओढ़ाताण होते न! तेव्हां तेच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढ़ील मार्गावर वाटचाल सुरू ठेवायचे गरजेचे असते ". आई अजून शाळेतून आली नव्हती, प्रतीकला मात्र असेच बसल्या-बसल्या आंचल आठवण आली पुन्हा!तो पण काय करेल न ? "त्यांची कॉलेजमध्ये खूप मैत्री होती आणि तीच मैत्री हळुहळु प्रेमाकडे़ वळली". "आंचल खूप स्नेहल व मृदूभाषी कन्या होती, आंचलचे वडील दिल्ली शहरातील एक सुप्रसिद्ध उद्योजक होते, त्यांनी स्वतानेच आपल्या मुलीचा सांभाळ केलेला होता" आणि तिचे लग्न एका चांगल्या कुटुंबात व्हायचे होते. आंचलच्या आईचे लहान वयातच निधन झाले, म्हणून तिच्या वडिलांनी स्वताच आई-वडीलांचे स्नेह देऊन तिचे पालनपोषण केले आणि तिच्या संगोपनाची पूर्ण काळजी घेतलेली.


"प्रतीकचे पण शिक्षण पूर्ण झाले होते आणि तो एका चांगल्या मार्केटींग कंपनीत काम करत असे", पण प्रतीक आणि त्याची आई मध्यमवर्गीय कुटूंबातले असून सहजपणे आपले आयुष्य जगत होते. "आंचलचे वडील असा विचार करत होते की या घरात त्यांची कन्या आनंदी जीवन जगणार नाही." आपल्या समाजात अजूनही अशी विडंबनाची गोष्ट व्याप्त आहे की कन्याला अद्यापच स्वत: चे लग्न ठरविण्याचे पूर्ण अधिकार देत नाही, ही खंत आहे आणि या समाजातील परंपरेचे पालन करून कन्यांना आपल्या प्रेमाचा त्याग नेहमीच करावा लागतो. फक्त याच परंपरेचा बळी पडलेली, "आंचलने प्रतिक शिवाय वडिलांच्या इच्छेप्रमाणे वेगळ्या मुलाशी लग्न करायला भाग पाडले ", आणि पलीकड़े तर ती मात्र प्रतीकच्या आईमध्ये आईचे प्रेम शोधायची, पण ते म्हणतात न की देवाने आधीच जोड़पे बनविलेले असतात! फक्त ह्याच विचारात बुड़ून मुली मोठ्यांचे आज्ञापालन करत आनंदी राहून लग्नासाठी हो म्हणतात हो.


"प्रतीक असा विचार करीत बसला होता की मुलींना प्रेमात विश्वासघात करणे स्वीकार्य असते ", पण आपल्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी प्रतीकार कधीच करू शकत नाही. त्याला राहुन-राहुन उमलण्यासाठी, दुःखाच्या वेळी त्याला पाठिंबा देत राहल्या ह्या प्रेमळ आठवणी आणि मग तो स्वतालाच विचारतो, ह्याचात आम्ही प्रेमींचा काय दोष ? बरं, आयुष्य तर वेळेप्रमाणे सतत पुढेच जातं, एक क्षण ही कुठेपण थांबत नाही हो.




तेवढ्यात सुरेखा येते! आणि म्हणते काय रे ? कशाला काळोख ठेवली आहे प्रतीक! अरे मुला, असेच जीवन जगणे असते रे. त्यामध्ये चढउतार होण्याचे बंधन ठरलेले असतात रे, अश्या वेळी आपण ह्या पृथ्वीवर मनुष्य जन्म मिळाले म्हणून हात जोडूनी देवाचे आभार मानले पाहिजेत! जेणेकरून आपण एकमेकांना मदत करून पण प्रेम देखील अनुभवू शकतो. जगात असे नाही की ते एकच प्रेम असते, फक्त निर-निराळ्या वळणावर डोळ्यांची दिशा फिरवली की, आपल्याला चहुकडे प्रेमाची फुले बहरलेली दिसतील आणि प्रेम म्हणजे हृदयातील भावना असते, आपण मनापासून ते अनुभवाल, ते आपल्याला तितकेच जवळ वाटेल. मुला! तुझ्या वडिलांच्या निधनानंतर मी त्यांच्या प्रेमळ आठवणींना मनात प्रेरणास्थान देऊन आयुष्यातील प्रत्येक नवीन क्षणांना सोईस्कर पार पाड़ले, तुझे संगोपन सुध्धा स्नेह आणि प्रेमाने करायचे होते न मला.



आंचलचे प्रेम आपल्या अंतरंगात बाळगता, जिव्हाळ्याचे प्रेम अशा प्रकारे पसरव की प्रत्येकजण या भावनाने तुला स्मरण ठेवेल, प्रत्येक नात्यात प्रेमाचे वेगवेगळे रूप असते रे, मुला!फक्त ते प्रेमाचे मन ठेवावे लागेल. आंचलसुद्धा त्याच्या वडिलांच्या प्रेमाच्या बंधनात बांधलेली होती, म्हणून तिच्या निर्णयाचे गैरसमज करुन घेऊ नको रे.



मग हळू हळू वेळ निघून गेला आणि प्रतीकने आपल्या आईच्या गोष्टी समजून आपल्या भावी विकासासाठी पूर्ण काळजी घेतली, याचा परिणाम म्हणून प्रतीकने स्वतःच मार्केटींगमध्ये व्यवसाय सुरू केला आणि भरपूर यश मिळवू लागला. मिश्राजी प्रतीक बरोबर काम करायचे, प्रत्येकजण त्यांना काका म्हणायचे आणि तो वडिलांसारखेच त्याच्यावर प्रेम ठेवत असे. व्यापारांच्या युक्त्या समजून दोघे पुढे जात होते. एक दिवस मिश्राजींनी प्रतीकला सल्ला दिला की आजकाल तुमच्या व्यवसायाला अंखिण फायदेशील करण्यासाठी प्रशिक्षणही दिले जाते, त्यासाठी तुला देहरादूनला जावे लागेल. उत्तराखंडच्या देहरादूनमध्ये संपूर्ण योजनेसह हे व्यवसाय पोहोचले आहे आणि तिथे तिवारीजी, मिश्राजींचे जुने मित्र होते. त्यांनी प्रतीकची राहायची व्यवस्था केलेली होती. प्रतीकचे प्रशिक्षण वेळेवर सुरु होते आणि त्याच दरम्यान प्रतीक आणि सर्वानसाठी जेवणाचे डबे आणते, तिवारी जी यांची मुलगी सृष्टी! खूपच सुंदर आणि दयाळू आहे बरका ती. दररोज या पद्धतीने साखळी सुरूच असते. प्रतीक आणि सृष्टी दोघान मधे चांगलीच मैत्री होते. सृष्टी तिला व्यवसायाबद्दल सल्ला पण देते, ती व्यवसायातील इतर कर्मचार्‍यांसह अभ्यागत पर्यटकांसाठी आणि पर्यटकांसाठी जेवणाची व्यवस्था करते आणि मसूरी येथे सर्व बागेतील व्यवस्था करण्याचे काम करत असे.



हिल स्टेशनची राणी मसूरी आपल्या नैसर्गिक सौंदर्य, समलिंगी सामाजिक जीवन आणि करमणुकीसाठी प्रसिद्ध आहे. मसूरी हि गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिरांचे प्रवेशद्वार आहे, जिथे हिमालयातील शिखरे आकर्षक आहेत. वर्णन केल्यानुसार त्याच्या सावलीचे शब्द कमी असतील. हळूहळू सृष्टी आणि प्रतीक यांच्यात खोल मैत्री होते, पण यावेळी प्रतीक थोड़ा घाबरलेला आणि ओशाळलेला होता! कारण त्याला असे वाटते की मनात कुठल्याही नव्या जागेवर इतका विश्वास ठेवणे योग्य नाही.



पण ही सृष्टी मात्र अत्यंत अज्ञात मार्गाने स्वत: च्या अज्ञात जगामध्ये जगत होती, इतरांना आनंद देण्यात एक अलौकिक आनंद वाटत होता तिला आणि मनातल्या प्रेमाचा गोळ्याला सर्वत्र बहरायचे प्रयत्न करताना आनंद नेहमी आनंद पसरविण्याचा प्रयत्न करायची ती. ते म्हणतात न मित्रांनो प्रेमा ह्यच क्षणांचा आनंददायक अनुभव म्हणूनच तर आठवणित असतो.



एके दिवशी प्रतीक आपल्या प्रशिक्षणाच्या दरम्यान थोड्या वेळाने फिरायला जाण्याची इच्छा करतो, सृष्टीला म्हणतो की मसूरी ह्या जागेची ख्याती खूप ऐकली आहे मी, कधीही पाहिली नव्हती, चल जाऊ आपण बरोबरच, मलाही एकत्र जायला आवडेल, एकट्याने फिरण्याबद्दल काय ग मज्जा? आनंद येईल अशा प्रकारे, तिवारीजींची देखील परवानगी पण देतात, … .. जा मुली, कधी-कधी आपल्या कामाच्या मधे अवकाशात फिरायला पाहिजे, नैसर्गिक वातावरणात सुध्धा मन अगदी प्रसन्न होते.


सृष्टी थोड्या विचारात गुंफलेली असते! पण जायला तैय्यार होते, परंतु मसूरी अभियोगीनसाठी आणि तेथील पर्यटकांसाठी जेवणाची व्यवस्था पण करत असते, तिला तेच काम करण्यात मनापासून खूपच आनंद मिळतो. मग मसूरीच्या मैदानावरील प्रत्येक दृश्यांचे कौतुक करण्यात वेळ कधी घालवला जातो हे दोघांनाही ठाऊक नसते. प्रतीकच्या मनाला एक वेगळं आकर्षण होते, तो असा विचार करतो की अरे मी पुन्हा प्रेमात पडलो आहे का ?..... मला फसवणूक तर नाही होणार न पुन्हा? या वेळी सृष्टीच्या प्रेमापोटी …………………… मनातले विचार मनात लुड़बुड़ करत होते की इतक्यात सृष्टी येते आणि म्हणते, प्रतीक कशी वाटली सर मसूरी ? आमच्या मसूरीची एक वेगळीच मज्जा असते ……………. प्रतीक फार एकाग्रतेने विचार करूनच विचारतो, सृष्टीला ................ अगं तू देहरादूनमध्ये राहतेस न ?, तेव्हां ती म्हणते! अरे माझा रोजचा प्रवास, सर ह्या जगाने बर्‍याच गोष्टी बोलल्या मला. प्रतीक पुन्हा एकदा ह्या विचारात होता की सृष्टी च्या नेहमी हसमुख राहण्याच्या स्वभावाला काही उत्तरच नाही ... इतके कष्ट करूनही सर्वांना हसत-हसत सर्व व्यवस्था करणे कौतुकास्पद आहे. मग तो सृष्टीला विचारतो की तुझे जर बहुतेक काम देहरादूनमध्येच असते! तर मग रोज इकडे येण-जाण का बरं करतेस? सृष्टीचे मन थोड़ेशे अश्रुपूरित होते, परंतु आज कधीही न रडणारी सृष्टी प्रतीक जवळ हे रहस्य प्रकट करते …………… ..ते म्हणतो न हो आपण आपल्याला ज्याच्यावर मनापासून प्रेम असते तेथेच काही मनातलं गुपित सांगितले जाते ..... तो अशे रहस्य त्याच्या पासून मुळीच लपवत नाही. खूप दु:खी अवस्थेत, ती सांगते की तिला काम करताना एक दिवस खूप प्रेमळ लहानशी मुलगी मिळाली, इतकी लहान हो ती! तिला हलता जगाविषयी माहिती नाही काही पण आणि तिचे आईवडिल ही नाही ..... जेव्हां मला कळले की मी खराब तावडीत सापडली आहे, तेव्हां कसे तरी तिचे जीव वाचवण्यासाठी मी आले आणि प्रतीक ऐकून मी स्तब्ध झाला ... शांततेने चहुकडे स्वताचा पदभार स्वीकारला …… पण सृष्टीने पुढे सांगितले की तिची प्रकृती पाहून तिने तिचे संगोपन करण्याचे विचार केले आणि तिचे सुंदर नाव पण ठेवले, खुशी ……… दिसायलाही सुंदर होती न! ती खूपच प्रतीक. मी तिला इथल्या शाळेत शिक्षणासाठी भरती पण केले, जिथे तिचे शिक्षण चांगले व पूर्णपणे होईल, तेथे व्यवस्था देखील चांगली असते आणि मी रोज तिला भेटायला जात असे, तिच्याशी खूप गप्पा-गोष्टी करते, मग ती खूपच आनंदी होते. ...... आनंदी खुशी फक्त नऊ वर्षांचीच तर होती.




मग पुन्हा प्रतीक स्वतःच्या विचारांमध्ये हरवला…. सृष्टीने थोड़ं थांबून विचारले?............तुम्हालाही आश्चर्य वाटले न हो ? या कारणास्तव, या छकुलीने मला जीवनात एक नवीन धडा शिकविला आणि त्या दिवसापासून मी माझ्या आयुष्याच्या बागेत सर्वत्र फुले पसरून बहरायला सुरुवात केली, सर…. मला त्या मुलीकडून जे प्रेम मिळाले ते फक्त मला मिळाले… ..आणि अशे वाटले की हेच क्षण आयुष्य जगायला शिकवतात आणि प्रत्येक आनंद मिळवतात . प्रत्येकाच्या विचारांची शैली वेगळी असु शकते सर ... आणि आपण विचारण्यापूर्वी मलाच सांगू द्या माझे उत्तर ... जर तुम्ही मला ह्या आयुष्यात अर्धांगिनी बनविले तर माझी खुशी पण माझ्याच बरोबर राहील! तरच मी माझ्या सासरी सुध्धा आनंदातले सुगंधित फुलांचा सुवास पसरवू शकेन.



हे ऐकून प्रतीक अगदी प्रसन्न होऊनी नाचायला लागला आणि त्याला आज मनाचे खरे आनंद प्राप्त झालेले, तो हृदयस्पर्शी मनाने सृष्टीला प्रेमाने जवळ घेऊन आतल्या कंठाने गदगद हून म्हणाला चल सृष्टी आपण खुशीला पण बरोबरच आईकडे घेऊन चलुया. अश्या प्रकारे प्रतीकची आईसुद्धा हे आश्चर्यकारक प्रेमाच्या रंगात रंगून स्तब्ध झाली ...... तिचा मुलगा प्रतीक ज्याला आज खरे आनंदी प्रेम मिळालं .. ................. आणि सर्वात महत्वाची भावना मनात एक वेगळ्याच प्रसन्नतेची अनुभूती अनुभवत होती.


जीवनात हेच क्षण आम्हाला आयुष्य जगायला शिकवतात हो आणि तेच महत्वाचे क्षण आठणीत नेहमी असावेत.


वाचकांनो मी खूप दिवसाने ही कहाणी लिहिली आहे! आशा करते आपल्या सर्वांना नक्की आवडेल आणि त्याच बरोबर आपली प्रतिक्रिया द्या हं! मी वाट बघतेय.

आपण सर्वांना जर माझे लिखाण आवडत असेल तर माझे अंखिण इतर लिखाण सुध्धा वाचायला मी सर्वांना आमंत्रित करते. धन्यवाद तुम्हाला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational