नागपंचमी ते रक्षाबंधन
नागपंचमी ते रक्षाबंधन
नुकताच पावसाचा शिडकावा पडून गेला
होता . त्या रीमझिम सरींनी वृक्ष, वेली
ओल्याचिंब झाल्या होत्या . शेतातील नवी
कोवळी रोप या पावसाचा मनसोक्त
आनंद घेत होती . कधी उन तर कधी सावलीचा
लपाछपीचा खेळ बघून त्यात रमत होती .
त्या खेळात सहभागी होऊन वाऱ्यावर डोलत
होती .मनासारखा पाऊस झाल्याने शेतकरी राजा
खूष होता . ओंकार रावांच्याच्या घरात सुद्धा , आनंदाचे
वातावरण होते . त्याची नात सुषमा दहावीच्या
परीक्षेत ब्यांनव टक्के मार्क्स मिळवून शाळेत
प्रथम आली होती . आबा सुषमावर खूष होते .
आपल्या घराण्यातील तू पहिली अशी आहेस
की, जिने शाळेत पहिली येऊन आपल्या
घराण्याचे नाव काढले . सुषमा आणि आबांचे
छान जमायचे . सुषमा एक दिवस आबांना
म्हणाली ,
सुषमा : " आबा , खूप दिवस झाले, रजनी
आत्याची भेट नाही . "
आबा : " अग अस काय बोलतेस , आत्ताच तर
तुझा रिझल्ट लागला होता, तेव्हा तुझे अभिनंदन
करायला आली होती की , लाडकी आत्या."
सुषमा : " त्याला दोन चार महिने झाले . मला
आत्याची खूप आठवण येतेय ."
आबा : " मग फोन करून, तिच्याशी बोल.
नाहीतर ते एकमेकींना दिसतात तो कॉल कर .
काय म्हणतात ग , त्याला ?"
सुषमा : " व्हिडिओ कॉल."
आबा: " हा _ _ व्हिडिओ कॉल करून . तुझ्या
आत्याशी बोल ."
आबा : " आबा , मला आत्याला भेटायचे आहे ."
आजोबा , नातीचे बोलणे ऐकून तिथे सुषमाची
आजी आली . ती हसत हसत म्हणाली,
आजी : " अहो _ _ सुषमा इतके म्हणतेय तर,
बोलावून घ्या ना लेकीला ."
आजोबा : " काही नको , पोरगी, तिच्या घरी
सुखात आहे ना , राहू दे. उगाच नेहमी नेहमी
माहेरी आल्याने , आपल्या पण घरात वाद नको
अन् तिच्याही घरात वाद नको ."
आजी : " वाद कशाला होतील ? पोरीबाळींचा
हक्क असतो म
माहेरावर . उदया सुषमा सासरी गेली
तर माहेर विसरणार थोडीच आहे ? तिचेही हे
माहेर हक्काचे असेल . तसेच रजनीचे पण आहे ."
आजोबा : " तिचा हक्क मी नाकारत नाही , पण
_ _ ."
आजी : " पण काय ?"
आजोबा : " पण इतक्यात रजनीचे आणि तिच्या
भावाचे फारसे पटत नाही . काहीतरी कारणावरून
त्यांची सारखी कुरबुर सुरू असते ."
आजी : " बहीण भाऊच ती . थोडीफार तू तू
मैं मैं _ _ होणारच . बारीसारीक गोष्टीवरून
रक्ताचे नाते , थोडीच तुटणार आहे ?"
आजोबा : " पहा तुझी इच्छा असेल तर , पंचमीला
रजनीला बोलावून घे ."
आजोबांनी रजनी आत्याला बोलावून घे , म्हणताच
सुषमाने लगेच आत्याला कॉल केला . तिने तो
रिसिव्ह केला .
सुषमा : " हॅलो आत्तू कशी आहेस ?"
रजनी : " मी मस्त आहे ग , तिकडे सर्व कसे
आहेत ?"
सुषमा : " आम्ही सर्व मजेत आहोत . आत्ता
तुझीच आठवण काढत होतो ."
रजनी : " माझी आठवण ? "
सुषमा : " आजीने तुला नागपंचमीला बोलावले."
रजनी : " हो का ?"
सुषमा : " चार दिवसांनी पंचमी आहे . तू जरूर
ये ."
रजनी : " नाही ग , जमणार नाही . शेतीची कामं
आहेत ."
सुषमा : " ते काही नाही आत्तु _ _ ! तू यायलाच
पाहिजे ."
रजनी : " अग खरंच नाही जमत बेटा ."
सुषमा : " आत्तु प्लिज ये ना ग _ _ .. अस काय
करतेस . तुझे गाव जवळ असल्याने तुला
बोलावते . मी जर बारावी नंतर कुठे लांब
शिकायला गेली तर , तुला थोडीच बोलणार
आहे ."
रजनी : " ठिक आहे, सुषमा , बघते . आजीकडे
दे फोन ."
सुषमा ;" हो देते , पण तू नक्की यायचं, बर का ? "
रजनी : " हो बाई मी नक्की येईल ."
सुषमाने आजीकडे मोबाईल दिला . ती निघून
गेली .
आजी : " हॅलो _ _ ."
रजनी : " काय ग आई कशी आहेस ?"
आजी : " फक्त फोनवरच विचारते का ? भेटीला
नाही येणार का ?"
रजनी : " सुषमा बोलावते म्हणून येते . तशी
माझी फारशी इच्छा नाही . पण सुषमाचा
आग्रह आहे , म्हणून येते ."
आजी : " माझा जीवात जीव आहे , तोवर येत
जा . मी गेल्यावर मग , भावजयने बोलावले
तरच यायचे. माय बाप असेपर्यंत मान
पान बघायचा नसतो . आठवण आली , काही
अडचण आली , की लेकीसाठी माहेर हे
हक्काचे असते ."
रजनी : " बर आई , येते मी ."
रजनीने येतो म्हटले . तिच्या येते या ,शब्दानेच
आईचा जीव सुखावून गेला . माय लेकीच
नात असतेच तस .. लेक जवळ असते , तेव्हा
माय तिला जरा काही चुकले की, रागावते .
पण ती जेव्हा सासरी जाते , तेव्हा.तिच्या
भेटीसाठी कासावीस होते . लेक येणार म्हणून
सुषमाची आजी सुरेखा बाई मनातून खूष झाली .
पण तिकडे सुषमाच्या आईचे म्हणजेच पुष्पाचे
तोंड फुगले . हे आजोबांच्या आणि आजीच्या
लक्षात आले . लगेच आजोबा म्हणाले,
आजोबा : " बघ , रजनी येणार , हे ऐकूनच
सुनबाईचे बघ कसे तोंड फुगले ."
आजी : " जाऊ द्या तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका .
हे घर आपलेही आहे . आपल्या घरी हक्काने
आपल्या लेकीला बोलवायचा आपल्याला
हक्क आहे ."
आजोबा : " तुझ म्हणणं बरोबर आहे . मी फक्त
रजनीच्या मुलाची फर्स्ट इ्यरची दिड लाख फी
भरली म्हणून समीर , किती चिडला होता ."
आजी : " जाऊ द्या , मागच्या गोष्टी आता अखडून
काढू नका ."
सुरेखा बाईंनी नको असलेला कटू विषय लगेच
बंद केला . पण मनातील विचारांना थांबविणे
शक्य आहे का ? ते तर सतत सुरूच राहतात .
जरा काही , आवाज झाला की , मनात खळबळ
होते अन् नको असलेले पुन्हा जसेच्या तसे
आठवते . आता हेच बघा ना , मागील दोन
वर्षापूर्वी घडलेली घटना सुरेखा बाईंच्या नजरें
समोर जशीच्या तशी उभी राहिली _ _ _
रजनीचा मुलगा , बारावी झाला होता . त्याचा
एका चांगल्या इंजीनिरिंग कॉलेजला नंबर
लागला होता . पण त्याची फी भरायला
रजनीकडे पुरेसे पैसे नव्हते . ती लगेच तिच्या बाबांकडे म्हणजेच ओंकाररावांकडे पैसे
मागायला आली .
रजनी : " बाबा यशच्या एडमिशन करीता
मला. दिढ लाख रुपये हवे आहेत . काहीही
करून तुम्ही मला द्या . मी जमेल तसे लवकरात
लवकर परत करेल . पण बाबा नाही म्हणू
नका .,"
ओंकरराव : " काही व्यवस्था होते काय , ते
बघतो ."
तिथे जवळच उभा असलेला रजनीचा भाऊ
सुधीर रागाने म्हणाला ,
सुधीर : " आता पेरणीचे दिवस आहेत . शेत
पेरायला पैसे लागतात . तुला कोठून देणार
पैसे ?"
रजनी : " अरे , सुधीर यशच्या शिक्षणाचा प्रश्न
आहे म्हणून _ _ _ . नाहीतर मी मागितले नसते .
आणि मी लगेच परत करेल ना _ _ , तुमचे
पैसे ."
सुधीर : " कशी परत फेड करशील ? अजून
पर्यंत दाजींच्या आजारपणात घेतलेले
पन्नास हजार परत केले नाहीस . दिढ लाख
कसे परत करशील ?"
रजनी : " कसे परत करायचे ते माझे मी बघून
घेईल . पण आता माझ्या यश साठी मला मदत
करा ."
सुधीर : " ते काही नाही . आधी मागचे पन्नास
हजार परत कर. मग हवे तर दोन लाख रुपये
घेऊन जा ."
रजनी : " माझ्या कडे पन्नास हजार रुपये असते,
तर मी परत केले असते . पण मागच्या वर्षी
तुझ्या दाजींच्या आजारपणात खूप खर्च झाला .
माझ्याकडे खरचं पैसे नाहीत ."
सुधीर : "तुझ्याकडे पैसे नसतील तर , यशला
शिकवू नको . पण आम्हाला त्रास देऊ नको ."
ओंकरराव : " सुधीर तू , असे कसे काय बोलू
शकतोस ? यश तुझा भाचा आहे . त्याच्या
शिक्षणाला मदत केली तर , बिघडते काय ?"
सुधीर : " यशच्या शिक्षणाला मदत करायला
हरकत नाही . पण ताईचे आता हे , नेहमीचेच
होऊन बसले . कधी आजारपणात मदत करा,
कधी पेरणी करीता पैसे द्या , तर कधी तिच्या
घरातील किराणा सामान भरून द्यावं . आम्हाला
आमचा संसार आहे की नाही ? "
रजनी : " तुमच्या समोर हात पसरवायला मला
तरी कुठे बरं वाटते ? पण या दोन वर्षात आमच्या
पुढे परिस्थितीत अशी आली , तर त्याला मी
तरी काय करू ?"
ओंकारराव : " जावईबुवा मोठ्या अपघातातून
वाचले , हेच देवाचे उपकार आहेत . त्यांच्या
दवाखान्यात तिचे दोन चार लाख तरी गेले
असतील . त्यामुळे तिला आपल्या समोर हात
पसरावे लागत आहेत ."
रजनी : " हो ना _ _ त्यात दोन वर्षापासून पीकपाणी
पण बरोबर होऊन राहील नाही ."
सुधीर : " हे तुझ नेहमीच रडगाण आहे ताई . मला
सांगू नको . मी तुला एक रुपयाची पण मदत
करणार नाही ."
सुधीरच्या या बोलण्यामुळे ओंकार राव खूप
संतापले . ते सुधीर वर हात उगारत म्हणाले ,
" खबरदार पुन्हा असं बोललास तर _ _ अजून
पूर्ण जमीन माझ्या नावावर आहे . माझी लेक
म्हणून रजनीचा पण त्यात वाटा आहे . तू जर
जास्त नखरे करशील तर , तिचा अर्धा हिस्सा
मी तिला देईल ."
रजनीची आई मध्ये पडत म्हणाली,
"भरल्या संसारात असे वाद करू नका . मी
तुमच्या पाया पडते . बाप लेक भांडू नका ."
रजनी : " बाबा , माझ्यामुळे तुमच्यात वाद होत
असतील तर मला नको तुमची कोणतीच मदत .
मी दुसरीकडे काही व्यवस्था होते का ? ते बघते ."
ओंकारराव : " त्याची काही गरज नाही . तू
दिढ लाख रुपये घेऊन जा ."
सुधीर : " म्हणजे तुम्ही माझे , ऐकणार नाही तर !"
मी इकडे शेतात मर मर करून पैसे कमवायचे
आणि तुम्ही ते , तसेच ताईला देऊन टाकायचे ."
ओंकारराव : " हे बघ , सुधीर तिची अडचण आहे,
म्हणून तिला मदत करतोय ."
सुधीर : " तिच्या अडचणी कधीच संपणार नाहीत .
मग काय आयुष्यभर _ _ ! तिला भिक टाकायची ?"
ओंकारराव : " तोंड संभाळून बोल . जर तुला
भाऊ असता तर , त्याचा इस्टेट मध्ये हिस्सा
पडलाच असता ना _ _ ! असे समज की रजनी
माझी दुसरा मुलगा आहे . मी तिला तिचा हिस्सा
देतोय ."
रजनी : " नाही बाबा , मला हिस्सा वगैरे नको ."
ओंकारराव : " तुला जरी हिस्सा नको असेल , तरी
हा तुझा नालायक भाऊ , निती सोडून वागत
असेल तर , मला तुला हिस्सा देण्याचा विचार
करावा लागेल ."
सुधीर : " तुम्हाला वाटेल ते करा ."
ओंकारराव : " मला जे योग्य वाटेल ते मी करेल.
मला काही कुणाची भीती न्हाई ."
सुधीर तेथून पाय आपटत निघून गेला . त्यानंतर
ओंकाररावांनी रजनीला तिच्या मुलाच्या एडमिशन
करीता दिढ लाख रुपये दिले . बाबांनी आपले
ऐकले नाही म्हणून सुधीर चांगलाच नाराज झाला .
तेव्हा पासून बाप , लेकांचे लहान सहान कारणां
वरून वाद होऊ लागले . वाद झाले की ,
ओंकारराव रजनीला हिस्सा देण्याच्या गोष्टी
करीत . ते ऐकून सुधीरचा पारा चढत असे .
रजनीला. जेव्हा ही , गोष्ट कळली., तेव्हा तिने
सुधीरला समजावून सांगितले , की मी तुझ्या
कडून कोणताही हिस्सा घेणार नाही . तू उगाच
बाबांशी वाद घालू नको . घरातील शांती भंग
करू नको . तिकडे सुधिरची बायको त्याचे
कान भारत असे , की तुम्हाला गाफील ठेवून
मामांजी आणि रजनी ताई आपल्या वावराचे
खरंच दोन हिस्से पाडतील . तुम्ही सावध रहा .
आपल्या जमिनीतील एक तुकडाही ताईला
मिळायला नको . सुधीरला बायकोचे म्हणणे
पटायचे . ती अधून मधून आगीत तेल ओतत होतीच . भरीस भर म्हणजे ओंकाररावांनी
रजनीला सुधिरचा नकार असल्यावरही दिढ
लाख रुपये दिले होते . त्यामुळे सुधीरने रजनीशी
बोलणेच सोडले होते . ती माहेरी आली की.,
तो. तिच्याशी एक शब्दही बोलत नसे . हे बघून
रजनीला वाईट वाटायचे . ती आईला म्हणायची
की ,. सुधीरला माझे इथे येणे आवडत नसेल
तर , मी माहेर बंदच करते . बोलल्या प्रमाणे
रजनीने माहेर येणे बंद केले होते . आली तरी
थोडा वेळ थांबायची आणि लगेच निघून जायची .
पण आता लाडक्या भाचीचा आग्रह ती मोडू
शकत नव्हती. त्यामुळे . रजनीने तिच्या आईला
, मी नागपंचमीला येतेय असा , निरोप पाठविला .
रजनी खूप दिवसांनी येणार म्हणून ,
बाई खूष झाल्या . ती येणार असल्याची बातमी
सुधीरच्या कानावर गेली . तो त्याच . रात्री मुद्दाम
ओंकाररावांना म्हणाला ,
सुधीर : " आता काय लाडाची लेक येणार आहे
तर , बाबा देतील पैशाच्या गड्ड्या काढून ."
आई :" रजनी पैसे मागायला येत नाही .तिला
सुषमाने आग्रहाने बोलावले म्हणून येत आहे ."
ओंकारराव : " आपल्याकडे खोऱ्याने पैसा नाही.
की आपण रजनीला गड्डया काढून देऊ . तिला
गरज होती . तेव्हाच पैसा दिला ."
सुधीर : * हो , पण. तो. देऊन आता दोन वर्ष
झाली . तिने तो परत नाही केला ना._._ !"
ओंकारराव : " करेल ."
सुधीर : " मला आत्ताच पाहिजे . माझी हिरो होंडा
जुनी झाली . सारखी बिघडत राहते . "
ओंकारराव : " यावर्षीचे पिकं आले की , घे ."
सुधीर : " ताईकडे आपले दिढ लाख रुपये आहेत .
ते मागून घ्या आणि मला नवी गाडी घेऊन द्या ."
ओंकार रावांनी सुधीरला नकार दिला . झाले
यावरून त्या दोघांची शाब्दिक चकमक सुरू
झाली . सुरेखा बाईंनी ती कशीबशी मिटवली .
नागपंचमी दोन दिवसांवर आली . सुरेखा बाईना
रजनी येण्याचा आनंद होता . पण दोघा बहीण
भवांचे काही भांडण तर होणार नाही , ही धास्ती
सुद्धा होती . पण जे होईल त्याला सामोरे जाऊ
असा विचार करून सुरेखाबाई रजनीला
आवडणारे पुरीचे बेसन लाडू करायला बसल्या .
तोच सुधीर आला . आईला बेसन लाडू करतांना
बघून म्हणाला ,
" अरे व्वा , ताईच्या आवडीचे लाडू करतेस."
सुरेखा बाईं : " हो रजनी नागपंचमीला येत आहे ."
सुधीर : " मला सांगायचे असते . मी सर्व सामान
आणून दिले असते ."
सुरेखा बाई : " घरात सर्व सामान होतेच बाहेरून
आनायची काही गरज नव्हती ."
सुधीर : " बर ठीक आहे, कर तू लाडू ."
सुधीर निघून गेला . तो जाताच ओंकारराव हळूच
सुरेखा बाईच्या कानात म्हणाले ,
" आज सुधीर खूष दिसतो . रजनीचे नाव घेतले
तरी चिडला नाही ."
सुरेखा बाई : " कितीही झाले तरी, बहीण भावाचे
रक्ताचे नाते आहे . थोड्याफार कुरबुरीने काहीही
फरक पडत नसतो . तुम्ही बघाच रजनी आली
की कसा गोड बोलेले तिच्याशी ."
ओंकार राव : " मला तरी दुसरे काय हवे आहे ?
दोन्ही बहीण भावांनी आनंदात राहावे नि सुख
दुःखात एकमेकांना मदत करावी . हेच पुरे आहे ."
दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता रजनी
माहेरी आली . ती येताच सुषमामाने तिला घट्ट
मिठी मारली . तिला हात पाय धुवायला पाणी
दिले . प्यायला पाणी दिले . सुरेखा बाईंनी
लेकीच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरविला .
सुधीरच्या बायकोने खोटे हसू आणून रजनीचे
स्वागत केले . चहाचा कप , तिच्या हाती दिला .
माय , लेकींनी सुख दुःखच्या गप्पा केल्या .
सुषमा तर सारखी अत्याच्या मागे पुढे करत होती .
दुपारी शेतावरून सुधीर घरी आला . रजनीला
बघून त्याच्या डोक्यावर आठ्या पडल्या . पण
थोड्याच वेळात , सुधिरच्या मनात काय आले
कुणास ठाऊक ? तो रजनीला म्हणाला ,
सुधीर : " केव्हा आलीस ताई ?"
रजनी : " सकाळीच आली ."
सुधीर : " जेवलीस का ?"
रजनी : " नाही रे."
सुधीर : " खूप उशीर झाला . जेवून घ्यायचे असते .
भूक लागली असेल ना _ _!"
रजनी : " तुझी सुषमा इतकी गोड आहे की ,
तिच्याशी बोलताना तहान भूक हरवून जाते ."
सुधीर : " पक्की आत्यावर गेली आहे ."
दोघा बहीण भावातील नाते , सुधारत असल्याचे
बघून ओंकार राव आणि सुरेखा बाईंना छान
वाटते . सर्वांनी मिळून एकत्र जेवण केले . खूप
दिवसानंतर आज घर हसत होते . दुसऱ्या दिवशी
नागपंचमी होती . सुरेखा बाईंनी पूजेचे सामान
विकत घेतले होते . लाह्या फुटाणे , त्या एका
डब्यात भारत होत्या . तोच बाहेरून चार पाच
बायकांचा घोळका आत आला . त्यांच्या हसण्या
खिदळण्याच्या आवाजावरून त्या रजनीच्या
मैत्रिणी आहेत हे सुरेखा बाईंनी ओळखले .
अंजू , कमला , गीता , अबोली सर्वच आल्या
होत्या. त्या येताच त्यांना बसायला रजनीने
चटई अंथरली .
रजनी : " बसा ग , बरं झाले तुम्ही सर्वजणी
सोबतच आल्या ."
अंजू ,: " आम्ही तर नेहमी भेटतो ग . पण तूच
अशी आहेस की, तुझी फारशी भेट होत नाही ."
रजनी : " अग , संसाराचा व्याप असा वाढला
की कुठे जायला फुरसत मिळत नाही ."
गीता : " संसाराचा व्याप काय फक्त तुला एकटिला
आहे ? आम्हाला संसार नाही का ,?"
अंजू : " हो ना _ _ जेव्हा बघावं तेव्हा रजनीला
घाई असते . कधी निवांतपणे चार आठ दिवस
माहेरी राहत नाही ."
अबोली : " तेच सांगायला आम्ही आलो आहोत .
उदया नागपंचमी आहे . आपण पहिल्या सारखे
रानातील कडुनिंबाला झोके . बांधून मस्त खेळू.
मी माहेरी सुधीर मुळे राहत नाही . आम्हा दोघा
बहीण भावाचे फारसे पटत नाही. हे तुम्हाला
कसे सांगू . असे रजनी मनांत म्हणाली . पण
मनातील दुःख मनात ठेवत ती म्हणाली ,
" आता आली आहे ना , तर मस्त मज्ज्जा करू ."
" पण तुम्ही आता सोळा वर्षांच्या नाही , याचे
भान ठेवून खेळा." सुरेखा बाईं सर्वांसाठी चहा
घेऊन येत म्हणाल्या .
खूप दिवसांनी भेटलेल्या मैत्रिणीची गप्पांची छान
मैफिल जमली .शेवटी आभाळ भरून आले, तेव्हा
त्या जाण्यास निघाल्या . जाण्यापूर्वी दुसऱ्या दिवशी
बरोबर एक वाजता , साखऱ्या विहिरी जवळच्या
माळरानात सर्वांनी भेटायचे ठरविले . सर्व मैत्रिणी
निघून गेल्यावर रजनीला ते लग्ना आधीचे दिवस
आठवले . काय मज्जा यायची तेव्हा _ _ !
श्रावण आला की , सोबत विविध सण घेऊन
येत येतो . पावसाच्या सरी जश्या तप्त धरेला
तृप्त करतात . तसेच श्रावणातील सण , कामाने
पिचलेल्या देहाला मानसीक शांती देतात .
तसेच दोन दिवस माहेरी आल्याने संसाराच्या
दुःखाचा काही काळ विसर पडतो .
रजनीने यावर्षी नागपंचमीच्या सणाचा मनसोक्त
आनंद लुटण्याचा निश्चय केला होता . ती पंचमीला
सकाळी लवकर उठली . सुधीरच्या बायकोला
तिने प्रत्येक कामात मदत केली . घरी पाटावर
चंदनाच्या उटीने नगोबाचे चित्र रेखाटले . त्याला देव्हाऱ्यात
ठेवून मनोभावे त्याची पूजा केली . लाह्या
फुटण्याचा नैवेद्य दाखवला . सुरेखा बाईंनी
आंबूस घाऱ्या आणि लाडूचा बेत केला होता .
सुधीर सोबत तिने जेवण केले . सुधीर सुद्धा
त्याच्या बायकोला रजनीला आग्रहाने वाढायला
सांगत होता . रजनी आज नेहमी पेक्षा जास्तच
जेवली होती . जेवण झाल्यावर तिला झोपेची
गुंगी येऊ लागली . डोळे भारी पडत होते . थोडा
वेळ आराम करावा असे , तिच्या मनात आले .
ती जाऊन पडणार तोच , तिच्या मैत्रिणी तिला
बोलवायला आल्या . मैत्रिणीचा घोळका दिसताच
रजनीची झोप पळाली. तरीही तिने तोंडावर पाणी
मारले . तोंडावर थोडीशी पावडर लावली . साडी
आणि केस ठिक केले.
अंजू : " अग चल ग , रजनी पटकन ."
कमला : " चल उरक पटकन . पाऊस आला तर
आपला खेळ होणार नाही . "
अंजू : " आज आभाळ स्वच्छ आहे . पाऊस
येईल असे वाटत नाही ."
कमला : " श्रावण महिना सुरू आहे , स्वच्छ
आभाळात केव्हा काळे ढग जमा होतील हे
सांगता येत नाही . लवकर निघायला हवे ."
अंजू : " चल ग , रजनी ."
रजनी : " हो हो , आलेच ." केस ठिक करत
रजनी म्हणाली .
अबोली : " मेक अप करायची काही गरज नाही.
तू सुंदरच आहेस ."
.
गीता : " आणि तुला बघायला काही दाजी येणार
नाहीत . जशी आहेस तशीच चल ."
गीताच्या बोलण्याने सर्वजणी हसायला लागल्या .
रजनी येते ग आई , असे म्हणत निघाली.
सुधीर : " ताई पायवाट निसरडी आहे , जरा
सांभाळून जाशील ."
" माझी काळजी करू नको . मला महेरातील
सर्व पायवाटा माहिती आहेत . " असे म्हणत
रजनी निघाली . गावाला लागून असलेल्या
साखऱ्या विहिरी जवळच्या मळ्यात नागपंचमी
निमित्ताने कडुनिंबाच्या झाडाला . मोठली
झुले बांधली होती . त्यावर बऱ्याच जणी
झोके घेत होत्या . माहेरी आलेल्या लेकींची
तिथे वर्दळ होती . एकमेकिंना सुख दुःख
वाटून घेत सर्वजणी . झोके घेत होत्या . रानाचा
हिरवा गारवा अन् मैत्रीचा जिव्हाळा यामुळे
संसाराचा व्याप विसरून रजनी आज
श्रावणाच्या सरीप्रमाणे मनसोक्त बरसणार
होती . तिचा उत्साह बघून , तिचे वय हळूच
मागे सरले अन् मनातील इंद्रधनू सप्तरंग घेऊन
खुलले . त्या इंद्रधनुच्या झुल्यावर , ती बसली .
मन गात होते
मन डोलत होते
मन रमत होते
मन रडत होते
कडू, गोड
आठवणीच्या
झुल्यावर मनसोक्त
मन ,झुलत होते
रजनी झोक्यावर बसली गीता तिला झोके देत
होती . आणखी उंच झोका दे , आणखी उंच
झोका जाऊ दे , असे म्हणून ती मुक्तपणे हसत
होती . आता मला झोका खेळू दे , असे म्हणून
अंजू झोक्यावर बसली . रजनी तिला झोके देत
होती . काही वेळाने पुन्हा रजनी झोक्यावर
बसली . तिला सर्वजणी आळीपाळीने झोके
देत होती . रजनीला आज झोका सोडावा वाटतच
नव्हता . सर्वजणी थकल्या. पण रजनी अजूनही
उत्साही वाटत होती . नागपंचमीची गाणे गात
ती झुलत होती .
संध्याकाळचे चार वाजत आले असतील .
निरभ्र आकाशात अचानक शामल मेघांनी गर्दी
केली . हळूहळू काळया ढगांचा अंधार दाटू
लागला . सर्वजणी घरी निघायला लागल्या .
तरीही रजनी मात्र , झोके घेत होती . गीताने
तिला आवाज दिला .
गीता : " रजनी बस झाले झोके खेळणे . चल
घरी जाऊ . पाऊस सुरू होण्याआधी घरी
पोहचायला हवे . "
रजनी : " अग , थांब थोडावेळ , इतक्यात नाही
येत पाऊस ."
गीता : " असं काय करते रजनी ? सर्वजणी निघाल्या
पण आपण दोघीच इथे आहोत ."
रजनी : " तुला जायचे असेल तर , तू जा . मी
नाही येत . "
गीता : " मी खरचं निघून जाईल बर ."
रजनी : " अग जा की _ _ पाऊस सुरू झाला तर ,
मी येईल धावत .तू नको काळजी करू . या
गारगार वाऱ्यात झोके खेळायला खूप मज्जा
येत आहे ."
गीता : " अग , तू पण चल ना _ _ !"
रजनी : " गीता जा तू , मी येते मागून."
नाईलाजाने गीता निघून गेली . रजनी लहान
मुलासारखे मस्त झोके घेत होती . आकाशातून
सरसर पावसाच्या सरी बरसू लागल्या . तरीही
तिचे झुलणे सुरूच होते . बघता बघता , सरसर
सरींनी मुसळधार पावसाचे रूप घेतले . श्रावणात
पाऊस हा उन , सावलीचा लपंडाव खेळत असतो.
पण आज का कुणास ठाउक त्याला मुसळधार
बरसायची इच्छा झाली . तो मुसळधार बरसत
होता अन् रजनीच्या झोक्याचा वेग हळूहळू कमी
झाला होता _
रात्र बरीच झाली . तरी रजनी घरी आली नाही .
म्हणून ओंकारराव काळजीत पडले . ते
बायकोला म्हणाले ,
.
" रजनीने आता पर्यंत घरी यायला हवे होते ."
सुरेखा बाईं : " पाऊस सुरू आहे ना _ _ तर
कुठेतरी थांबली असेल ."
ओंकार राव : " सुषमा जरा छत्री घेऊन जा
आणि ती कुणाकडे. थांबली असेल तर बघून
ये . तिला फोन करून विचारावे तर, तिने मोबाईल
घरी ठेवला आहे ."
सुषमा बॅटरी आणि छत्री सोबत घेऊन आत्याला
शोधायला गेली . रजनीच्या सर्व मैत्रिणीकडे ती
जाऊन आली . पण रजनी कुणाकडेच नव्हती .
सुषमा घरी परत आली . आत्या कुठेच दिसली
नसल्याचे तिने आजी आजोबांना सांगितले .
आता मात्र ओंकाररावांच्या पायाखालची जमीन
सरकू लागली . त्यांच्या हृदयाचे ठोके वाढू
लागले . तोच सुधीर आला. त्याला बघताच
ओंकाररावांच्या जीवात जीव आला . ते त्याला
म्हणाले ,
"सुधीर रात्रीचे अकरा वाजत आले . रजनी
अजूनही घरी आलेली नाही . "
" बाहेर पाऊस सुरू आहे . थांबली असेल
कुणाकडे ."
" सगळीकडे शोध घेतला तिच्या सर्व मैत्रिणींना
फोन करून झाले , पण तिचा कुठेच पत्ता नाही ."
" थांबा मी बघून येतो ." असे म्हणत पायात चप्पल
घालत सुधीर रजनीला शोधायला निघाला .
तो परत येईपर्यंत ओंकाररावांच्या घरातच फेऱ्या
मारणे सुरू होते . तो उदास चेहरा करून परत
आला. तेव्हा तर ओंकार राव मटकन खाली
बसले . सुधीर आणि सुषमाने सगळीकडे फोन
करणे सुरू केले . रजनी कुठेच नाही , हे कळताच
ओंकाररावांचा जीव घाबरला . सुरेखाबाई तर
रडायलाच लागल्या . हळूहळू रजनी गायब
झाल्याची बातमी शेजारी पसरली . बाहेर
पावसाने पुन्हा जोर धरला होता . त्या पावसातही
शेजारचे कुणी अंगावर घोंगडे घेऊन, तर कुणी
छत्री घेऊन रजनीची चौकशी करायला येत होते .
रजनी कुठे गेली होती ? किती वाजता गेली
होती ? तिच्या सोबत कोण कोण होते ? ही सर्व
प्रश्न भेटायला येणारे विचारीत होते . त्या प्रश्नांनी
ओंकारराव आणखीच , अस्वस्थ होत होते .
शेजारी राहणारे थोडा वेळ थांबून निघून गेले .
पण घरातील लोकांना ती रात्र बेचैन करीत होती .
सुधीरला त्याच्या आई वडिलांची अवस्था
बघवत नव्हती . सुषमा सुद्धा आत्याच्या काळजीने
चिंताग्रस्त झाली होती . सुधीर हातात टॉर्च घेऊन
दोन तीन वेळा , गावात चक्कर मारून आला
होता . रजनीच्या मैत्रिणींचे कॉल वर कॉल्स
सुरू होते . पण कोठूनही काहीही खबर मिळत
नव्हती . पावसाचा जोर आता बऱ्या पैकी कमी
झाला होता . पण घरावर रजनीच्या काळजीचे
मेघ जमा झाले होते . ती भयाण रात्र सर्वांनी
जागून काढली . सकाळी सकाळी सर्वांचा डोळा
लागला असावा . पण झोपेतही सर्वाच्या मनात
रजनीचे विचार येत असावेत .
रात्री उशीरा झोपल्यावरही सुरेखा बाईंना सकाळी
लवकर जाग आली . त्या उठून बसल्या . बाहेर
पावसाची रिपरिप सुरू होती . त्यांनी तोंड धुवून
गुळणा केला . एरव्ही त्यांना उठल्या उठल्या चहाची
तलफ येत असे . पण आज त्यांचे चहा पिण्यास
मन होत नव्हते . पण फक्त बसून काय करावे ?
म्हणून त्या उठल्या आणि चुलीपाशी गेल्या . चुलीत
तुराटीच्या काड्या मोडून टाकत नाही , तोच
दारावर टकटक आवाज आला . रजनी आली
असेल ,असा विचार करून सुरेखा बाईंनी दार
उघडले . समोर शेजारचा शिवा उभा होता . तो
लगेच म्हणाला,
" काकी सुधीर भाऊ उठले नाही का ?"
शिवाच्या आवाजाने घरातील सगळेच जागे झाले .
शिवा , सुधिरच्या कानात काहीतरी कुजबुजला.
सुधीर लगेच चुळ भरून , त्याच्या सोबत गेला .
काय झाले असेल ? याचा अंदाज न आल्याने
सर्वांचे चेहरे काळजीत पडले . हळूहळू त्यांच्या
घरापुढे बरीच लोकं जमा होऊ लागली . सगळे
दबक्या आवाजत बोलत होते .पण कुणीच काही
सांगत नव्हते . थोड्याच वेळात , पोलिसांची
गाडी दारात उभी राहिली . त्यांनी ओंकार
रावांना काही जुजबी प्रश्न विचारले . आणि ते
निघून गेले . पोलिस निघून जाताच , सुधीर धाय
मोकुन रडू लागला .
". आपली रजनी आता या जगात राहिली नाही ."
सुधीरचे काळीज चिरून टाकणारे शब्द , ऐकून
सुरेखा बाईंची दातखिळी बसली . जमलेल्या
बायकांनी त्यांच्या तोंडावर पाण्याच्या झापड
मारून त्यांना शुध्दीवर आणले . ओंकाररावांना
दरदरून घाम फुटला . अंगातील कपडे ओलेचिंब
झाले . आजूबाजूला बायका , माणसांची कुजबुज
सुरू झाली . मला तर पहाटेच रजनी पाण्यावर
तरंगताना दिसली होती . भीतीने तशीच , धावत
घरात आली . माझ्या बी कानावर बातमी आली
होती . पण ओंकार काकांना कसे सांगावे हेच
कळत नव्हते . कुणी म्हणाले की , रजनीने
नाल्याच्या पुरात उडी मारून जीव दिला , तर
कुणी म्हणत होते की , तिला कुणीतरी ढकलून
दिले . दहा तोंड दहा गोष्टी बोलत होते . नेमके
काय झाले ? हे कुणालाच माहिती नव्हते .
या बातमीने गावावर अवकळा पसरली. पावसाने
अजून जोर धरला होता . त्या पावसात कुणी
भिजत तर , कुणी छत्री घेऊन , चिखल तुडवत
ओंकाररावांच्या घरी येत होते . त्यातच रजनीचा
नवरा नरेश पावसात भिजत आला . आल्या आल्या
त्याने हंबरडा फोडला .
" माझी रजनी ग , मला सोडून कुठे गेलीस ग ?
मला सोबत घेऊन जायचे होते . माझ्या आजार
पणात किती सेवा केलीस माझी . आता अशी
मला एकट्याला सोडून का निघून गेलीस ?"
संध्याकाळ पर्यंत पोस्टमार्टम होऊन रजनीची
डेड बॉडी घरी आली . तेव्हा सर्व गाव रडले .
पुढे ती डेड बॉडी तिच्या गावी नेण्यात आली.
आणि तिथे भर पावसात त्यावर अंतिम संस्कार करण्यात आले . भरून आलेले आभाळ रिते
होत होते . श्रावण महिन्यात सहसा विजा चमकत
नसतात . पण अचानक विजांचा तांडव सुरू झाला .
विजांचा तांडव काहीतरी सांगत
होता . अचानक एक वीज चमकली . तिने
सरणावर , निपचित पडलेल्या रजनीच्या
चेहऱ्यावर लख्ख उजेड पाडला . त्या उजेडात
सुधीरला रजनीच्या रक्त गोठल्याचा मानेभोवती
गोल राऊंड दिसला . ते बघून सुधीर दचकला.
रजनीचा खुन तर झाला नसेल ? ही शंका त्याच्या
मनात येऊन गेली . पण त्या पावसात आणि
दुःखी वातावरणात असे काही बोलण्याची सोय
नव्हती . मनातील दुःख मनात ठेवत , तो मूकपणे
अश्रू ढाळत होता . रजनीवर अंतिम संस्कार
करून तो घरी आला . अंघोळ करून फ्रेश झाला .
तोवर रात्रीचे दहा वाजले होते . त्याच्या बायकोने
ताट वाढून आणले . अन्नाचा अपमान नको म्हणून
दोन घास खाऊन त्याने ताट बाजूला सारले.
रजनीचा अचानक झालेल्या मृत्यूने ओंकारराव
आणि सुरेखा बाईंवर आभाळ कोसळले . त्यात
चौकशी करीता पोलिसांच्या सारख्या चकरा सुरू
होत्या . त्यांच्या चौकशीचे चक्र सुरू झाले की
त्या वृद्ध जोडप्याचा जीव कासावीस होत असे .
या चार पाच दिवसांत गावात फक्त एकच चर्चा सुरू होती की , रजनीचा खून झाला की तिने आत्महत्या केली ? या चर्चेला मात्र उधाण आले होते .एक दिवस पोलिस घरी आले आणि सुधीरला रजनीच्या खुनाचा संशयित आरोपी म्हणून त्याला पकडून घेऊन गेले .
सुधीर टाहो फोडून सांगत होता की ,
"रजनीचा खून मी केलेला नाही . मी माझ्या सख्या मोठ्या बहिणीचा खून का करू ? "
पोलिस : " आम्ही केलेल्या चौकशीत असे दिसून
आले आहे की , तुझे वडील रजनीला नेहमी
पैशांची मदत करीत असत . तुला ते अजिबात
आवडत नसे . त्यावरून तुमचे नेहमी वाद सुद्धा
होत . तुमचे वाद इतके विकोपाला गेले होते की ,
रजनीने माहेरी येणे बंद केले होते ."
सुधीर ; " आमच्यात पैशांच्या कारणावरून वाद
जरूर होते . पण याचा अर्थ असा नाही की , मी
ताईचा खून करेल ."
पोलिस : " जास्तीची बकबक करू नको . चल
पोलिस कोठडीची हवा खाल्ली की , सगळं खर
खोट बाहेर येईल ."
सुधीर : " बाबा , तुम्ही तरी काही बोला ."
ओंकारराव काहीही न बोलता आत निघून गेले .
त्यांच्या या वागण्याचा अर्थ न कळण्या इतका
सुधीर लहान नव्हता . पोलिसांना चला म्हणून
तो त्यांच्या सोबत निघाला . सुधीरला पोलीस
घेऊन जात होते , तोच त्याची बायको पुष्पा
समोर आली . पोलिसांना गयावया करत म्हणाली,
" भाऊ त्यांना असे पकडून नेऊ नका . मला माझ्या
नवऱ्यावर भरोसा आहे . ते असा गुन्हा सात
जन्मातही करणार नाहीत . "
पोलिस : " ताई तुम्ही आमच्या कामात अडथळा
आणू नका . आम्हाला आमचे काम करू द्या ."
सुधीर पोलिसांच्या गाडीत बसून निघून गेला .
पुष्पा तिच्या सासऱ्याकडे वळत म्हणाली ,
" मामांजी , तुमचा लेक असे वाईट कृत्य करेल
का हो ?"
ओंकारराव काहीही बोलले नाहीत . पण त्यांच्या डोळ्यातून झरझर अश्रू वाहत होते . पुष्पाने
त्यांची मनःस्थिती समजून घेतली . ती काहीही
न बोलता स्वयंपाक घरात निघून गेली . चूल
पेटवून तिने सर्वांचा चहा करायला गंजात
पाणी ठेवले . पाण्याला उकळी आली . त्या
पाण्याच्या वाफेकडे बघत , तिने मनात विचार
केला , आपल्या मनातील दुःखाची अशी झरझर
वाफ झाली तर, किती बरे होईल . पण पाण्याचे
वाफेत रूपांतर व्हायला आधी आगीचे चटके
सहन करावे लागतात . मग हिच वाफ . ढग बनून
उंच आकाशात जाते , आणि पावसाच्या सरींच्या
रुपात पुन्हा गारवा घेऊन येते . मी पण कितीही
त्रास झाला तरी , माझ्या नवऱ्यावरील खोटा
आळ , दूर करील आणि आमच्या संसारात पुन्हा
गारवा आणेल . रंजना ताई तर , पुन्हा येणार
नाहीत . पण त्यांचा खून झाला असेल , तर त्यांच्या
खुन्याला शोधून काढेल .
पुष्पाने रजनीच्या मारेकाऱ्याला शोधून काढण्याचा मनाशी चंग बांधला . तिच्या डोक्यात लगेच
विचारांचे चक्र सुरू झाले . आता उशीर करून
चालणार नाही . लगेच हालचाल केली पाहिजे .
असा विचार करून , ती भराभर कामाला लागली .
घरातील काम संपवून , डोक्यावर पदर घेऊन
बाहेर पडली . त्या दिवशी रजनी सोबत असलेल्या
तिच्या मैत्रिणींच्या घरी गेली . कुणी तिच्याशी
तुटक बोलले . तर कुणी उगाच पोलिसांची
झंझट मागे लागेल , म्हणून तिच्याशी बोलायचे
टाळले. अंजूने मात्र तिला घरात घेतले .
आस्थेने घरातील सर्वांची चौकशी केली . रजनीच्या
दुःखद बातमीने तिच्या डोळ्यांत पाणी आले .
अंजू : " वहिनी रजनीच्या बाबत असे , व्हायला
नको होते ."
पुष्पा : " जे घडले ते खूप वाईट झाले . सुषमा
तर स्वतःलाच दोष देते . सारखी म्हणत असते
की , मी आत्याला माहेरी येण्याचा फोर्स केला
नसता तर , असे काही घडले नसते . ती तर
सारखी माझी आत्या मला सोडून का गेली ?
असे म्हणून रडत असते ."
अंजू : " सुषमा फक्त निमित्त झाली . कदाचित
रजनीच्या नशिबात असेच मरण असेल ."
पुष्पा : " हो , पण ताईच्या खुनाच्या अरोपातील,
संशयीत आरोपी म्हणून सुषमाच्या बाबाला
पोलिसांनी धरून नेले ."
अंजू ,: " काय सांगताय काय वहिनी तुम्ही ???
दादाने रजनीला , कधी एक चापट मारल्याचे
आम्ही कधी पाहिले नाही . तो तिचा खून करणे
शक्यच नाही . "
पुष्पा : " इतक्यात , दोघा बहीण भावांचे जरा
बिनसले होते . पण ती दोघे पुन्हा बोलायला
सुद्धा लागली होती _ _ ! "
अंजू : " बहीण भावाचे भांडण म्हणजे पाण्यावरचा
बुडबुडा असतो . थोडा वेळ राहतो आणि पुन्हा
पाण्यात एकरूप होतो ."
पुष्पा : " पण हे पोलिसांना नाही कळणार _ _
त्यांना वाटले की , बहीण भावाचे पटत नव्हते,
म्हणजे रजनी ताईचा खून यांनीच केला आहे ."
अंजू : " वहिनी आता काय होईल ग ?"
पुष्पा : " मी गप्प थोडीच बसणार आहे ? मला
सांग की, तुम्ही त्या दिवशी ,झोके खेळायला
गेल्या होत्या , त्यावेळी रजनी ताईचा मूड कसा
होता ?"
अंजू : " रजनी एकदम खुश होती . आमच्या पेक्षा
खूप उत्साही वाटत होती . छान गाणी म्हणत
होती . सर्वांना झोके देत होती . ती पण उंच उंच
झोके घेत होती . तिचे उंच झोके बघून माझ्याच
मनात धडकी भरली होती ."
पुष्पा : " मग पुढे काय झाले ?"
अंजू : " अचानक आभाळ भरून आले . आम्ही
सर्वजणी भराभर घरी जाण्यास निघालो . रजनीला
सुद्धा घरी चल म्हणू लागलो . पण ती आम्हाला
म्हणाली की , तुम्ही निघा , मी पाऊस सुरू झाला
तरी एकटी येईल . मला आणखी झोके खेलावेसे
वाटतात . शेवटी गीता तिच्या करीता थांबली होती .
पण ती पण थोड्या वेळाने निघून आली ."
पुष्पा : "इतक्या पावसात रजनी ताई एकट्याच
कशा काय थांबल्या असतील ?"
अंजू : " तेच तर कोडे आहे ? आम्ही तिला खूप
विनवण्या केल्या की , चल घरी , पावसाने जोर
धरला तर , तुला इथून निघणे मिश्किल होईल .
पण तिने आमचे अजिबात ऐकले नाही . ती
झोक्यावरून उतरायला तयार नव्हती . शेवटी
आम्ही निघून आलो . घरी पोहचत नाही , तोच
जोराचा पाऊस सुरू झाला . रजनी घरी आली
की नाही हे , विचारावे तर , तिचा मोबाईल नंबर
पण कुणाकडेच नव्हता ."
पुष्पा : " रजनी ताईला नक्कीच कुणीतरी भेटले
असेल ."
अंजू : " तेव्हा सुधीर दादा कुठे होता ?"
पुष्पा : " तेव्हा ते ,बंडू भाऊजींकडे होते . पाऊस
कमी झाल्यावर घरी आले . आल्या आल्या रजनी
ताईंना शोधायला गेले . "
अंजू : " त्या रात्री रजनीला गावात येताना कुणीही
बघितले नाही ."
पुष्पा : "रजनी ताई गावात आल्याचं नाही , तर कुणी
बघेल तरी कसे ? आणि तेव्हा पाऊस पण खूप
जोराचा सुरू होता ."
अंजू : " रजनी गावात आली नाही , पण तिला
माळरानावर कुणीतरी भेटले असेल . "
पुष्पा : " हो , कुणीतरी रजीनाला तिकडेच भेटले
असेल ?"
अंजू : " पण कोण भेटले असेल ? ती तर फारशी
कुणाशी संबंध ठेवत नव्हती . नेहमी तिच्या कामात
असायची ."
पुष्पा : " बर अंजू येते मी. गरज पडली तर ,
आपण दोघी तुम्ही झोके खेळले होते , तिथे जाऊन
येऊ ."
अंजू : " वहिनी तुम्ही केव्हाही बोलवा , मी येईल .
रक्षाबंधन पर्यंत मी इथेच आहे ."
पुष्पा घरी निघून आली . रजनीच्या खूनाच्या
संशयीत आरोपी म्हणून सुधीरला पकडून नेल्याने
ओंकारराव बेचैन झाले होते . ते कुणाशी बोलत
नव्हते . एकटे राहत होते . गावात दिढ लाखांसाठी
सुधीरने रजनीला मारले , ही चर्चा सुरू होती ., त्यामुळे ओंकाररावांच्या घरातील कुणीही बाहेर
पडत नव्हते . पुष्पाला तिच्या नवऱ्याची म्हणजेच
सुधीरची काळजी लागून राहिली होती . ती सुधीरला
भेटायला गेली . तेव्हा तिने , त्याला ठणकावून
विचारले की , तुम्हाला आपल्या सूषमाची शपथ
आहे , तुम्ही माझ्याशी खरे बोला . तेव्हा सुधीर
डोळ्यात पाणी आणून म्हणाला,
" पुष्पा , माझ्या मेहनतीचे पैसे बाबा रजनीला
द्यायचे . मी प्रत्येक गोष्टीत कटकसर करायचो .
स्वतःसाठी कोणतीही वस्तू घेत नव्हतो आणि
बाबा रजनी मागेल तेव्हा तिला पैसे देत . ही
गोष्ट मला अजिबात आवडत नसे . पण तरीही
माझा रजनी मध्ये जीव होताच . मी तुझ्या डोक्यावर
हात ठेवून सांगतो , की मी रजनीला मारले नाही ."
पुष्पा : " माझा तुमच्या बोलण्यावर विश्वास आहे .
आता रजनीला कुणी मारले , हे मी शोधून काढते ."
सुधीर : " म्हणजे तू काय करणार आहेस ,? उगाच
करायला जाशील एक आणि घडेल भलतेच ."
पुष्पा : " मी तुम्हाला असे ,अपराध्याच्या पिंजऱ्यात
उभे नाही बघू शकत ."
पुष्पा मनात काहीतरी निर्धार करून , गावी परत
आली . दुपारचे तीन वाजले होते . ती आल्या
आल्या सरळ अंजूकडे गेली . अंजू घरी एकटीच
होती . अंजुने पुष्पाला पाणी दिले . पुष्पाचा चेहरा
रडवेला दिसत होता . अंजुने काय झाले ?
विचारताच पुष्पाच्या मनाचा बांध सुटला . ती
अंजूच्या गळ्यात पडून तिने हंबरडा फोडला .
अंजुने तिला थोपटले . जेव्हा पुष्पाचे मन रिते झाले .
तेव्हा अंजू म्हणाली ,
अंजू : " काय झाले वहिनी ?"
पुष्पा : " आज ह्यांना भेटायला तालुक्याच्या गावी
गेली होती . त्यांना मी असे पोलीस कोठडीत बघू
शकत नाही . "
अंजू : " मग काय करायचे ठरविले वहिनी तू ?"
पुष्पा : " आपण आत्ताच त्या , जागेवर जायचे का ?
जिथे रजनी सोबत तुम्ही झोके खेळले होते ?"
अंजू : " आत्ता _ _ !"
पुष्पा : " हो , आत्ताच ."
अंजू : " पण तिथे जाऊन काय फायदा ? पोलिसांनी
खूप शोधले पण त्यांना काहीही पुरावा भेटला नाही .
उलट सुधीर दादाचे पैशाचे पाकीट तिथे सापडले .
म्हणूनच तर , सुधीर दादाला पकडून नेले ना .
त्याचे अन् रजनीचे भंडण होत होते ."
पुष्पा : "बोलण्यात वेळ घालवू नको . अंधार
पडेपर्यंत आपण घरी परत आलो पाहिजे ."
पुष्पा आणि अंजू माळरानावर गेल्या . तिथे दोन चार कडूनिंबाची खूप मोठी झाड होती . वर्षांनुवर्षे
नागपंचमीला याच झाडांना झोके बांधून , सासरी
गेलेल्या लेकी , इथे जमून सुख दुःखाचा . गोष्टी
करीत असत . या रानाच्या एका बाजूला एक नाला
वाहत असतो . ज्याला फक्त पावसाळ्यात पाणी
असते . एरव्ही तो कोरडा पडलेला असतो .
जोराचा पाऊस पडला की , त्या नाल्याला पुर
सुद्धा येतो .
अंजुने पुष्पाला रजनी , ज्या झोक्यावर
बसली होती तो , झोका दाखविला . दोघींनी
त्याच्या आजूबाजूला काही सापडते का ? याचा
शोध घेतला . पण तिथे कोणतीही संशयित वस्तू
सापडली नाही . अंजुला मात्र रजनी झोक्यावर
बसून मनमुराद झोके घेत असल्याचे भास होत
होते . ती पुष्पाला घरी चला असा घोषा लावत
होती . माळरानावर काहीही सापडले नाही .
तेव्हा पुष्पा नाल्याकडे जाण्यास निघाली .
अंजू सुद्धा नाईलाजाने तिच्या मागे चालू लागली .
अचानक आभाळ भरून आले आणि क्षणात
जोरदार पाऊस सुरू झाला . पुष्पा घाबरली नाही .
ती निर्धाराने पावसात भिजत पुढे जात होती .
सोबतीला अंजू होतीच . नाल्याच्या काठावर
त्या दोघींचा पुन्हा शोध सुरू झाला . बराच वेळ
शोधून काही सापडले नाही . आता पावसाचा
जोर आणखी वाढला होता . नाल्याचे पाणी
अचानक वाढू लागले . त्या पाण्यात एक वस्तू
तरंगताना पुष्पाला दिसली. पुष्पाने लगेच , त्या
पाण्यात उडी घेतली . तिला पोहणे येत असल्याने
पाण्यात पोहून तिने , ती वस्तू हातात घेत , पुन्हा
काठावर परत आली . अंजू पुष्पाच्या या धाडसा
कडे बघतच राहिली . अंजूला तिने ती वस्तू
दाखविली . लगेच दोघी घरी परत आल्या. तेव्हा
त्या पूर्णपणे भिजल्या होत्या . अंजू भावाच्या घरी
परत गेली . पुष्पा तिच्या घरी आली . सापडलेली
वस्तू तिने कपाटात ठेवून दिली . लगेच ओले कपडे
बदलून घेतले . आज तिने मुद्दाम ओंकाररावांच्या
आवडीचे पिठलं भाकरी आणि हिरव्या मिरचीचा
ठेचा बनविला होता . जेवण आटोपली . पुष्पा
काम आटोपून ओंकाररावांच्या जवळ गेली . ते
ओसरीत एका खुर्चीवर शून्यात नजर लावून
बसले होते . सुरेखा बाईं त्यांच्या बाजूला खाली
चटईवर बसल्या होत्या . पुष्पा त्यांच्या जवळ
जाऊन बसली . आणि जरा दबक्या आवाजात
म्हणाली _ _
पुष्पा : " मामांजी , जरा बोलायचे होते ."
ओंकारराव : " आता काही बोलून फायदा आहे
का ? आधीच जर नवऱ्याला जरा समजावले
, तर बहीण भावाचे भांडण असे विकोपाला
गेले नसते ."
पुष्पा : " मामांजी पाण्यात काठी मारल्याने पाण्याचा
प्रवाह कधी तुटतो का ? तसेच बहीण भावाचे नाते
असते . काठी मारल्याने ते तुटल्या सारखे वाटते
पण पुन्हा तो प्रवाह एकच होतो. "
ओंकारराव : " सर्व कळते तर मग , आधीच नाही
का सावरायला पाहिजे . ते जाऊ दे . मुद्द्याचे
काय ते बोल ."
पुष्पा : " मला तुम्हाला काहीतरी दाखायचे आहे ."
ओंकारराव : " काय दाखवायचे ते पटकन दाखव ."
पुष्पाने एक महागडी घड्याळ , त्याच्या समोर
ठेवली . ती घड्याळ बघताच ओंकारराव म्हणाले,
ओंकारराव : " ही घड्याळ तुला कुठे सापडली ?
तुला रजनीच्या बॅग मध्ये तर , सापडली नाही?"
पुष्पा : " मी कशाला ताईच्या बॅगला हात लावू ?"
ओंकारराव : " मग कुठे सापडली ही घड्याळ ?"
पुष्पा : " माळराना जवळच्या नाल्यात ."
ओंकारराव : " तू तिकडे कशाला गेली होती ?"
पुष्पा : " मी तिकडे कशाला गेली होती ? हे
महत्वाचे नाही मामांजी _ _ ! ही घड्याळ कुणाची
आहे ते सांगा ?"
ओंकारराव : " जावईबापूंची आहे ती घड्याळ ."
पुष्पा : " मामांजी नीट बघा ,त्यांचीच आहे का ?"
ओंकाराव : " हो ."
सुरेखा बाई : " तुम्ही कसे काय ओळखता की,
हे जावई बापूंचे घड्याळ आहे ?"
ओंकारराव : " अधिक महिन्यात त्यांचा खूप
हट्ट होता, की मला असे घड्याळ पाहिजे . मग
मिच त्यांना घेऊन दिले होते . तुम्हाला कुणालाही
न सांगता ."
पुष्पा : " हे , तर खूप महागडे घड्याळ आहे ."
ओंकारराव त्यावर काहीही बोलले नाही .
पुष्पा मात्र जे समजायची ते , समजली .
ओंकारराव ओसरीत फेऱ्या मारत होते . काही
वेळाने ते पुष्पाला म्हणाले ,
ओंकारराव : " सुनबाई , हे घड्याळ आपण उद्या
पोलिसांना दाखवू ? "
पुष्पा : " त्यापेक्षा आपण जावई बापूंना विचारले
तर _ _ !"
ओंकारराव : " हे घड्याळ तुला सापडले आहे , हे
जर त्यांना कळले तर , ते सावध होतील. त्यापेक्षा
आपण पोलिसांनाकडे हे घड्याळ देऊ. जी
काही चौकशी करायची ते पोलिस करतील."
पुष्पा : " तुम्ही म्हणता , ते बरोबर आहे मामांजी."
दुसऱ्या दिवशी , ओंकारराव आणि पुष्पा
पोलिस स्टेशनमध्ये गेले . तिथे ओंकाररावांच्या
ओळखीचे पोलीस इन्स्पेक्टर पितळे होते .
त्यांना ते भेटले . पुष्पाने ते घड्याळ इन्स्पेक्टर
पितळे यांना दाखविले . त्यांनी ते घड्याळ
ठेवून घेतले . ओंकाररावांना म्हणाले की तुम्ही
निश्चिंतपणे घरी जा . या घड्याळामुळे आता
आमच्या तपासाला एक दिशा मिळाली आहे .
काही गरज पाडली तर , तुम्हाला बोलावून घेऊ .
पुष्पाने दिलेला घड्याळ हा महत्त्वाचा पुरावा
ठरू शकतो . असा विचार करून इन्स्पेक्टर
पितळे यांनी तो घड्याळ व्यवस्थित ठेवला .
लगेच ते , रजनीच्या नवऱ्याकडे म्हणजेच
नरेशकडे गेले . अचानक पोलीस घरी आल्याने
नरेश गडबडला . त्याने एक खुर्ची इन्स्पेक्टर
पितळे यांना बसायला दिली . या खोलीत किंवा
खोलीच्या आजूबाजूला कुणीही थांबायचे नाही .
अशी घरातील इतर सदस्यांना तंबी दिली .
खोलीचे दार आतून बंद करून घेतले .
इन्स्पेक्टर त्यांच्या पोलिसी नजरेने घर न्याहाळत होते . त्यांच्या त्या नजरेने नरेशच्या मनात धडकी भरली .
पितळे : " घर तस् ठिक ठाक आहे तुमचे ."
नरेश : " हो साहेब ."
पितळे : " तुमच्या मिसेसनी छान सजवलेले
दिसते ."
नरेश : " हो साहेब , रजनीला सर्व नीटनेटके हवे
असायचे ."
पितळे : " महागड्या वस्तूंचा शौक होता का त्यांना ?"
नरेश : " नाही हो , रजनी तशी काटकसरी होती .
वायफळ खर्च केलेला तिला आवडत नसे ."
पितळे : " मग , किमती वस्तू वापरायचा तुम्हाला
शौक होता का ?"
नरेश : " नाही साहेब , आम्ही गरीब माणस .
आम्हाला कसली शौक ?"
पितळे : " काही लोकांना सवय असते . आपले
शौक दुसऱ्याच्या पैशांनी पूर्ण करायची ."
नरेश काहीही बोलला नाही . त्याचे गप्प बसने
इन्स्पेक्टर पितळे यांना समजले . ते पुढे म्हणाले,
पितळे : " बरं , ते जाऊ द्या . तुमचे सासरे ओंकार
राव भेटले होते ."
नरेश : " आ _ _ केव्हा भेटले होते ?"
पितळे : " केव्हा भेटले होते, ते फारसे महत्त्वाचे
नाही . त्यांचा एक निरोप घेऊन आलो आहे ."
नरेश : " त्यांनी तुम्हाला कशाला त्रास दिला ?
मला फोन केला असता तर, मीच त्यांच्या भेटीला
गेलो असतो ."
पितळे : " विषय जरा नाजूक आहे . जावई
माणसाला दिलेली गिफ्ट परत कशी मागावी ?
हा त्यांना सांकोच पडला . म्हणून त्यांनी मला
तुमच्या कडून एक वस्तू घेऊन यायला सांगितले ."
नरेश : " काय मागितले त्यांनी ."
पितळे : " तसे पाहिले तर, हा तुमचा घरागुती
मॅटर आहे . पण सहज सेवा भाव म्हणून मी
त्यांचे काम करतोय ."
नरेश : " काय म्हणायचे आहे तुम्हाला ?"
पितळे ,: " अधिक महिन्याचे गिफ्ट म्हणून तुमच्या
सासर्यांनी तुम्हाला एक घड्याळ दिली होती . ती
त्यांची त्यांना परत हवी आहे ."
नरेश : " पण जावयाला दिलेली गिफ्ट कधी, कुणी
परत घेते का ? आमचे सासरे पण अजब आहेत .
त्या घड्याळाचे त्यांना आता काय करायचे ?"
पितळे : " ओंकारराव घड्याळ चुलीत घालतील .
आपल्याला काय त्याचे . त्यांनी मागितली तर
, आपण देऊन टाकायची . चला आणा ती
घड्याळ . मला जास्त वेळ इथेच थांबायला वेळ
नाही . द्या लवकर ."
नरेश ,: " साहेब , तुम्ही कशाला टेन्शन घेता ?
मी घड्याळ सासरे बुवांकडे पोहचवून देईल ."
पितळे लगेच नरेशची कॉलर पकडून म्हणतात ,
" ती घड्याळ घरात असेल तर तू देशील ना _ _ !"
नरेश : " साहेब , ती घड्याळ माझ्या कडून हरवली ."
पितळे : " कुठे हरवली ?"
नरेश : " मी खामगवला बी बियाणे आणायला
गेलो होतो ना _ ! बहुतेक तिकडेच हरवली असेल ."
पितळे : " किती दिवस झाले घड्याळ हरवायला ?"
नरेश : " झाले असतील दोन महिने ."
पितळे : " मग पोलीस कंपलेंट नाही केलीस का ?"
नरेश : " नाही ."
पितळे : " इतक्या महागड्या घड्याळ हरविले
असल्याची कमलेंट करायला हवी होती ."
नरेश : " नाही केली ."
पितळे त्यांच्या खिशातून घड्याळ काढून नरेशच्या
डोळ्यासमोर धरतात .
पितळे : " हिच आहे का ? ती घड्याळ ?"
नरेश : " अशीच होती . "
पितळे : " जरा नीट बघा . हिच होती ."
पितळे आवाज चढवून बोलले .
नरेश : " साहेब एकसारख्या घड्याळी खूप असतात ."
पितळे : " हे घड्याळीचे बील . ही तुमचीच घड्याळ
आहे . याची मी खात्री करून आलोय ."
नरेश जरा वरमला .
नरेश : " हो , साहेब , ही माझी घड्याळ असू शकते ."
पितळे : " ही तुझीच घड्याळ आहे . आता बऱ्या
बोलाणे कबूल कर की , रजनीचा खून . झाला
नेमकी त्याच ठिकाणी तुझी घड्याळ कशी काय
सापडली _ _ ?"
नरेश : "साहेब, माझी घड्याळ हरवली होती .
ती नेमकी त्याच ठिकाणी कशी काय गेली , हे
मी कसे सांगू शकेल ?"
पितळे : " तू म्हणतोस की , तुझी घड्याळ
हरवून एक महिना झाला . बरोबर ना ."
नरेश : " हो साहेब एक महिना झाला असेल ."
पितळे : " आता सांग , तुझ्या बायकोचा खून
होऊन किती दिवस झाले ? "
नरेश : " जेमतेम आठच दिवस झाले साहेब ."
पितळे : " मग रजनी सोबतचा तुझा हा फोटो,
केव्हाच आहे ?"
पितळे मोबाईल मधील एक फोटो नरेशला
दाखवत म्हणाले .
नरेश : " आठवत नाही साहेब . रजनी बाहेर
कुठेही फिरायला गेली की, आमच्या दोघांची
सेल्फी घेत असे ."
पितळे : " तुला आठवत नसेल तर , मी आठवण
करून देतो . हा फोटो श्रावणातील पहिल्या
सोमवारचा आहे . तुम्ही दोघे सिध्देश्वर मंदिरात
दर्शनाला गेले होते ."
नरेश : " हो साहेब आठवले . हा त्याच मंदिरातील
फोटो आहे ."
पितळे : " जरा निरखून बघ . या फोटोत तुझ्या
हातात , हिच घड्याळ दिसत आहे . पहा जरा
झूम करून पहा ."
नरेशला आता भर पावसात घाम फुटला होता .
तो मटकन खाली बसला .
पितळे : " आता बऱ्या बोलणे कबूल कर , त्या
मुसळधार पावसात नेमके काय घडले होते ?
तुझ्या विरोधात मला एक ठोस पुरावा सापडला आहे . आणखी पुरावे गोळा करायला वेळ लागणार
नाही ."
नरेश :" साहेब जरा पाणी मिळेल का ?"
इन्स्पेक्टर पितळे त्याला पाणी देतात . तो
गटागटा पाणी पितो आणि भराभर बोलायला
लागतो _ _
नरेश : " माझे सासरे ओंकारराव माझ्या पेक्षा जरा
श्रीमंत आहेत . त्यांचा त्यांच्या लेकिवर म्हणजेच
रजनीवर खूप जीव होता . तशी रजनी खूप गुणाची
होती . पण जरा स्वाभिमानी होती . आमच्या
प्रत्येक अडचणीच्या वेळी माझे सासरे मला
थोडीफार आर्थिक मदत करीत असत . ते पाच
दहा हजार रुपये आम्ही त्यांना काही काळाने
परत करायचो . मी रजनीला म्हणायचो की ,
पाच दहा हजर रुपये , परत केले नाही तर , तुझ्या
वडिलांना काहीच फरक पडणार नाही . पण ती
म्हणायची त्यांचे कष्टाचे पैसे आहेत . ते आपण
परत करायला हवेत . मला तिचे म्हणणे अजिबात
पटायचे नाही . पण नाईलाज होता . म्हणून मी
त्यांचे पैसे परत करायचो ."
नरेश मधेच बोलायचा थांबला .
पितळे : " चल पुढे सांग ."
नरेश : " मागच्या वर्षी आम्ही , त्यांच्या कडून दिढ
लाख रुपये घेतले होते . इतकी मोठी रक्कम
परत करणे शक्य नव्हते . रजनीचे आणि तिच्या
भावाचे त्यावरून नेहमी खटके उडत . त्यांच्यात
काही दिवस अबोला सुद्धा होता . मी याच गोष्टीचा
फायदा घेत , सासरे बुवांना पाच दहा हजार
नेहमी मागत होतो . एक दिवस रजनी मला
म्हणाली की, आपण मुलाचे शिक्षण करून इतके
पैसे एकावेळी जमा करू शकत नाही .. बाबांचे
पैसे किती दिवस ठेवायचे ? त्यावर मी म्हणालो
की , काय घाई आहे ? जेव्हा आपल्या कडे
येतील तेव्हा देऊ . पण ती म्हणाली की , मी
माझ्या कडेचे काही सोन्याचे दागिने मोडते आणि
काही जवळचे पैसे टाकून , बाबांचे पैसे परत
करते . मी नाही म्हणालो . पण ती ऐकायला
तयार नव्हती . घरात ती स्वतःही खूप काटकसरीने खर्च करायची आणि मलाही पै पै चा हिशोब मागायची . मी तिच्या कांजुषणाला कंटाळलो होतो . अरे माणूस आहे मी , जरा काही हौस मौज करावी की नाही __ ! पण रजनीचे सारखे मागे टूमन असायचे की माझ्या बाबांचे पैसे परत करा .शेवटी मनात नसतांनाही, मी तिचे म्हणणे कबूल केले . ती खूप खुश झाली . पण मी आतून चिडलो . आणि _ _ "
पितळे : " आणि काय केले तू ?"
नरेश : " आणि मी तिचा काटा काढायचा ठरविले .
त्यात माझी जुनी मैत्रीण मला मागच्या वर्षी भेटली.
तिच्या आणि माझ्या नेहमी भेटी होत . ती तिच्या
नवऱ्याला फरकती घेऊन माहेरी रहायला आली
होती . ती नर्स आहे . त्यामुळे पैशाचा झरा आहे .
रजनीचा डाव खतम करून , मला तिच्याशी
लग्न करायचे होते . आणि रजनीच्या खुनाचा
आरोप तिच्या भावावर आणायचा होता ."
पितळे : " तर अशी चाल होती का ,तुझी ?"
नरेश : " हो , म्हणून मी सुषमाचा रजनीला फोन
आला , तेव्हा मी तिला म्हणालो की, तू बिनधास्त
माहेरी जा . मी . सर्व सोने मोडून , पैशांचा बंदोबस्त
करून ठेवतो . आणि स्वतः दिढ लाख रुपये
घेऊन येतो . ती या गोष्टीला तयार झाली . मला
आधीच माहिती होते की , रजनीला नागपंचमीला
झोके खेळायला खूप आवडतात . त्या दिवशी
सकाळीच मी तिला कॉल केला होता. आणि
सांगितले होते की, यावर्षी मी तुझ्या सोबत
झोके खेळणार . तुझ्या सर्व मैत्रिणी झोके खेळून
गेल्या तरी तू माझी तिथेच वाट बघ . मी येईल.
आपण झोके खेळू . मग दोघे मिळून घरी जाऊ
आणि बाबांचे दिढ लाख रुपये परत करू .
दादाला सरप्राइज देऊ. रजनी खूष होती . ठरल्या
प्रमाणे मी गेलो . तिला पैसे दाखविले . पाऊस
सुरू झाला होता . अंधार दाटून आला होता . ती
दोन चार झोके खेळली आणि घरी जाऊ म्हणाली .
मी तिला म्हणालो इतकी काय घाई आहे ?
पावसाचा जोर वाढला होता . आणि त्या रानात
आम्ही दोघेच होतो . मी लगेच खिशातून नायलॉन
दोरी काढली . तिचा गळा आवळला . ती बेसावध
होती . त्यामुळे प्रतिकार करू शकली नाही .
मी पूर्ण ताकदीने तिचा गळा दोरीने अवळला .
तिने थोडीच झटपट करून , जीव सोडला .
तिच्या ओरडण्याचा आवाज पावसामुळे
कुणाला ऐकू जाणे शक्य नव्हते . मी
तिची डेड बॉडी तिथेच सोडून जाणार होती .
तिच्या डेड बॉडी जवळ मी , मुद्दाम सुधिरचे
पैशांचे पाकीट ठेवले होते . पण लगेच जवळ असलेल्या नाल्याला पूर आल्याचे मला जाणवले . मी
रजनीची डेड बॉडी नाल्यात टाकून दिली . आणि
तसाच घरी आलो . त्यात माझा घड्याळ केव्हा
तिथे पडला , हे माझ्या लक्षात आले नाही .
मला वाटले होते की , रजनीची डेड बॉडी सकाळ
पर्यंत दूर कुठेतरी वाहत जाईल . आणि तिने
आत्महत्या केली असा सगळ्यांचा गैरसमज होईल .
पण तिची डेड बॉडी एका झुडपात अडकली ."
पितळे : " आणि तू तिथेच फसला . तुझा घड्याळ
सुद्धा कुठेतरी पडून होता आणि नेमकी पुष्पा
त्या माळरानात गेली , तेव्हा नेमका तिला तो
घड्याळ दिसला . पाण्यात वाहत होता . तो
पुष्पाने ताब्यात घेतला ."
नरेश : " पण , मी तर घड्याळ , तिथे जाऊन
खूप शोधला होता . मला सापडला नाही . नेमका
पुष्पाच्या हाती कसा काय लागला ?"
पितळे : " तू सुधीरला रजनीच्या खुनाच्या केस
मध्ये अडकवून स्वतः निर्दोष सुटणार होता. हे
कदाचित रजनीला आवडले नसेल . तिचा आत्मा
त्या जागेत भटकत असेल . तिनेच तो घड्याळ
पुष्पाला दाखविला असेल. हाहा हा हा _ _ .
नरेश माझा तुझ्यावर दाट संशय होता . पुरावा
मी कोठूनही शोधून आणला असताच . तुझे सर्व
बोलणे रेकॉर्ड झाले आहे . चल पोलीस स्टेशनला ."
दोन दिवसांनी , सुधीर सुटला . तो दिवस
रक्षाबंधनचा होता . सुटून आल्यावर सुधीरने
आधी रजनीच्या फोटोला नमस्कार केला . आणि
म्हणाला ,
" ताई , मला माफ कर .मी तुझी परिस्थिती जाणून
न घेता , तुझ्यावर चुकीचे आरोप केले होते . तू
जिवंत असताना मी तुझी किंमत केली नाही .
तुझ्याविना माझा राखीचा हात आता . सुना सुना
वाटेल ."
तेवढ्यात आकाशात वीज चमकली . त्या प्रकाशात
सुधीरला रजनीचा चेहरा दिसला . आकाशात
ढग जमा झाले आणि मुसळधार पावसाला
सुरुवात झाली _