सांजसखी
सांजसखी
पार्थीच लग्न ठरलं. ठरलं म्हणजे ठरवलं ते ही प्रेम विवाह! तीच्या लग्नाला मिष्का हौसेने आली मग मंगळागौरीला देखील. पण त्याच्या कुटुंबात काही मैत्री नाही झाली. 'नाही तर नाही. आपण दोस्त आहोत न? बास आहे की!' परत एकदा दोघांच्या मनात होतं...!!
पार्थीचा नवरा तिला घेऊन परदेशात निघाला. थोडं अजून चांगलं आयुष्य मिळवायला. मिष्का अगदी धावत पळत गेली विमानतळावर भेटायला, पण तिला तसा थोडा उशीरच झाला. ती पोहोचली तोपर्यंत ते दोघेही आत गेले होते. पार्थीच्या आई-वडिलांशी थोडफार बोलून ती जड मनाने परतली. घरी खिडकीत बसून दोघांच्या मेसेंजरवरच्या गप्पा, कधीतरी अधून मधून भेटले होते तेव्हाचे किस्से आठवत होती आणि अचानक तिचा मोबईल वाजला. तिचा फोन होता. विमानतळावरून! तिच्या डोळ्यात पाणी उभं राहीलं.
"जातेस?"