वाड्याचे रहस्यमय गूढ...
वाड्याचे रहस्यमय गूढ...
जसे पृथ्वीवर देव आहे..त्याचप्रमाणे भूत,
प्रेतही आहेत...एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जर वेळेच्या आधी झाला, तर असे म्हणतात की, त्याच्या इच्छा आकांक्षा अपुऱ्या राहतात....आणि परिणामी त्या
व्यक्तीचा आत्मा भटकत राहतो...पूर्वी असे समजायचे की, अशा व्यक्तींचा आत्मा घरांमध्ये किंवा वाड्यांमध्ये वास
करतात...अशा ह्या रहस्यमय घराच्या गोष्टी असतात....
आजही पुण्याच्या शनिवार वाड्यात रात्रीच्या वेळेला, "काका मला वाचवा"
ही किंकाळी ऐकू येते, असे आजूबाजूचे लोक म्हणतात, कारण सुमारे तीनशे साडे तीनशे वर्षापूर्वी तेथे पेशव्यांच्या पुतण्याच्या वध करण्यात आला होता, हत्या करण्यात आली होती...
एखाद्या पुरातन किंवा खूप जुन्या पडीक वाड्यामध्ये जेव्हा आपण एकटे फिरतो, त्यावेळेला आपणास काही भास होतात, काही वाडे असे बनविलेले असतात की, त्यामध्ये आतल्याआत रस्ते असतात, पण ते कोणाला माहिती नसतात, आणि चुकून एखादा माणूस कधी तिकडे गेला तर त्याच्याकडून काहीतरी घडून ते रस्ते उघडे होतात व आतमध्ये काही ना काही
रहस्यमय घटना घडत असतात....
पूर्वीच्या वेळी राजे महाराजे आपल्या किल्ल्यांमध्ये काही येण्या जाण्यासाठी फक्त वाटा ठेवत होते... या वाटा कालांतराने बंद होतात, पण जेव्हा कोणाकडून उघडल्या जातात त्यावेळेला
आतमध्ये शास्त्र, खजिने व ते खजिने मिळवण्यासाठी पूर्वीच्या लोकांनी केलेला प्रयत्न असफल झाल्यामुळे त्यांच्या मृत अवस्थेतले सापळे पडलेले भेटतात... त्यामुळे त्या जागेची गूढ रहस्य वाढत जातात.....