खेळ सावल्यांचा ( भाग १० )
खेळ सावल्यांचा ( भाग १० )
( भाग १० )
आपण मागच्या भागात पाहिले सुयोग . मोहित .विकास व अक्षय निखीलचा निरोप घेऊन घरी परत यायला निघाले . रस्त्यात ऐका हॉटेलमध्ये त्यांनी जेवण केले व पुढच्या प्रवासाला निघाले .
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
काही अंतरावर गेल्यावर त्यांची गाडी जोरात खड्ड्यात आदळली तसी गाडीची स्पीड कमी होऊन गाडी थांबली .
य्ये काय झालं रे गाडी का थांबविली !
थांब बघतो म्हणत मोहित व विकास गाडीमधून खाली उतरले .
" ओ शीट " गाडीचा टायर पंक्चर झाला .
ओ नो म्हणत सुयोग व अक्षय ही गाडीमधून बाहेर आले .
चल स्टेपनी काढु म्हणत मोहित ने गाडीची मागची डिक्की उघडली " अरे यार स्टेपनी पण नाही ."
आता काय करायचे जवळपास इथे गँरेज पण नाही आणि थांबायला जागा पण नाही . असा सुयोग मोहितला बोलला .
अक्षय तर खुप भित्रा होता. तो पहिले घाबरला व मोहितला थोडा चिडून बोलला तुला कळत नव्हते का यायच्या अगोदर चेक करायचे स्टेपनी आहे की नाही !
अरे चिडायला काय झालं तुला माहीत आहे ना आपण किती घाईघाईने निघालो त्यामुळे त्याच्या लक्षात राहीले नसेल असे सुयोग अक्षय ला समजवत होता .
आता ईतक्या रात्री कुठे जायचे असा प्रश्न अक्षय ने केला .
अरे दोन किमी अंतरावर माझ्या मावशीचे घर आहे आपण तिकडे जाऊन थांबुया . मावशी नागपूरला मुलाकडे गेली आहे तेव्हा तिच्या घरी पण कोणीच नाही .
पण जाणार कसे ?
चला गाडीला धक्का मारत जाऊया असा मोहित बोलताच अक्षय बोलला . ईतक्या लांब ?
त्याशिवाय पर्याय नाही . इथे जवळपास थांबण्यासाठी कुठेही जागा नाही म्हणून आपल्याला गाडीला धक्का मारतच जावे लागणार आहे आणि दोन तर किलोमीटर आहे .
चला म्हणत मोहित आत बसला व बाकीच्यांनी गाडीला धक्का मारायला सुरुवात केली .
कसेबसे ते विकासच्या मावशीकडे पोहचले .
मावशीही घरी नव्हती व शेजारचे जोशी काका त्यांच्या पत्नी वारल्यापासून तेही आपल्या मुलाकडे निघून गेले होते. कित्येक दिवसापासून त्यांचे घर रिकामेच होते .
विकास आता काय करायचे मावशीच्या दाराला तर कुलूप आहे !
मावशी कडून नेहमी चाबी हरविते म्हणून ती नेहमी फुलांच्या कुंडी खाली चाबी ठेऊन जाते .
अरे इथे तर किती फुलांच्या कुंड्या आहे नेमकी कोणत्या कुंडी खाली चाबी असेल .
अरे शोधुया . चला मला चाबी शोधायला मदत करा .
चाबी शोधताना ऐका कुंडीखाली सुयोग ला चाबी मिळाली . त्याने ती चाबी विकास ला दिली . त्याने घराचे दार उघडले .
" हुश्श " दमलो रे बाबा म्हणत सुयोग आत सोफ्यावर जाऊन बसला .पाठोपाठ सर्व आत जाऊन बसले . ये बरं झालं तुझ्या मावशीचे घर जवळ होते नाहीतर आपल्याला रस्त्यावर च रात्र काढावी लागली असती .
हो ना अक्षय बोलला .मला तर रामगड चा किस्सा आठवला व अंगावर काटाच आला .
नको रे तो विषय काढू . आता शांत झोपा . सकाळीच आपल्याला लवकर निघायचे आहे .
ते सर्व थकल्यामुळे सर्वाना लवकरच झोप लागली.
रात्रीला काहीतरी खुडबुड खुडबुड असा आवाज आला त्यामुळे अक्षयला जाग आली त्याने घड्याळीत बघितले तर रात्रीचे अडीच वाजले होते . त्याला वाटले आपल्यातलेच कोणी उठले असेल व किचनमध्ये पाणी प्यायला गेले असेल . पण त्याने आजूबाजूला बघितले तर सर्वंच झोपले होते .
जाऊ दे उंदीर वैगरे असेल म्हणून तो परत झोपला पण थोडया वेळाने त्याला पुन्हा तोच आवाज आला . आत त्याने विकास ला उठविले .
ये विकास ये उठ ना बघ घरात कसलातरी आवाज येतोय .
कुठे कसला आवाज येतो .तु स्वप्न बघितले असेल तू झोप बरं व मलाही शांत झोपू दे म्हणत त्याने कुस बदलली .
मलाच काहीतरी भास झाला असेल असे स्वतःशीच बोलत अक्षय परत झोपला .
थोडया वेळाने छोट्या खलबत्त्यात काहितरी कुटण्याचा आवाज आला व सर्वांना जाग आली .ते ते सर्व एकमेकांकडे बघत त्यांनी कानोसा घेतला तर आवाज शेजारच्या जोशी काकांच्या घरातून येत होता .
थोड्या वेळात लगेच चहाचा सुगंध आला .त्यांना खात्री पटली नक्कीच जोशी काकांच्या घरी कोणीतरी रहात आहे त्यांच्याच किचनमध्ये कोणी फक्कड चहा बनविला .
अरे तू तर म्हणत होता जोशी काका त्यांच्या मुलाकडे गेले आहे व बाहेर सुद्धा दाराला कुलूप आहे .पण चहाचा सुगंध त्यांच्याच किचनमधून आला .
जोशी काकांच्या घरात कोणीतरी असेल म्हणून विकास ने मागच्या खिडकीतून डोकुन बघितले ….………
……………………………………………………………………………
जोशी काकांच्या घरात कोण आहे बघुया पुढील भागात