निस्वार्थ प्रेम......
निस्वार्थ प्रेम......
त्या दोघांचे एक मेकावर जिवापार प्रेम होते जरा जास्तच प्रेम होते...
तिच्या साठी काय करू आणि काय नको करू अस त्याला झालेलं....
मात्र त्याचा खिसा कायम फाटलेलाच आणि कडका असायचा ...
पण प्रेमाच्या बाबतीत भलताच रोम्यांटीक ह ह होता बिचारा..
त्याच्या शिवाय जगणे त्याला ही कल्पनाही करवत नसे...
तिला कही गिफ्ट दयावं अस त्याला नेहमी मनापासून वाटत असे...
पण दयायच काय ??? खिश्यात तर खळकु नाय..
शेवटी न राहून त्याने मोठ्या प्रेमाने कागदाची रंगीबेरंगी फुले बनवली आणि तिला प्रेझेनट केली ,, ते बघून ती पण खूप खुश झाली ,, तशीही ती त्याच्या कडून जास्त अपेक्षा नव्हती करत तो जे देत होता त्यातच ती समाधानी राहत होती,, तसाही तो सामान्य च होता जेम तेम नोकरी ही नहीं कही करून दाखवेल अशही काही नव्हत ...
पण एकमेकाच्या प्रेमात बुडालेले ते दोघं जीव सुखात होते ..
पण एक दिवस अचानक सर्वा नुरच पालटला, ती म्हणाली तुझ्या सोबत आयुष्य जागाच म्हटल तर मला आयुष्य भर रड रड करत, मन मारत जीवन जगावं लागेल काय सुखात ठेवशील तू मला काय आहे तुझ्याकडे?? काहीच नहीं .. म्हणून मी तुला सोडून विदेशी जात आहे पुन्हा कधीच तुला भेटणार नहीं .. तू मला विसर आजपासून आपले मार्ग वेगळे माझा तुझा संबंध येथेच संपला ..
ती कायमची निघून गेली आणि , हा मोडून पडला सर्व कही समपल अस त्याला वाटू लागलं , जणू कही आभाळच कोसळलं ,
आणि याच्या मनातील दुःखाचे आसू आता संतापाचे लाह्या उसळत तळतळायला लागल्या त्याने ठरवलं
तिने पैसे साठी आपल्याला सोडलं ना.,, आता आपण खूप पैसे कमवून दाखवायचे इतके की तिला आपल्या सोमार सार जग छोट दिसलं पाहिजे पुढे या जिद्दीने पेटून उटला तो झोकून दिलं स्वतःला खूप कष्ट केले राबराब राबला मित्रांनी मदत केली, चांगले लोक भेटलो त्याचे दिवस पालटले तो खूप श्रीमंत झाला..
स्वतःची कंपनी उभारली पैसा, नोकर ,चाकर ,गाळ्या , बंगला मानसमान सर्व कही कमावलं त्याने ..
तेंव्हा त्याला आठवण झाली तिची....
विरहाच्या अग्नितून , प्रेमभंग अपंमानास्पद दुःखातून तो बाहेर पडला उभा राहिला जगण्यासाठी धडपडला आणि यशस्वी झाला पण तरीही त्याच्या मनात तिची चुटपुट कायमच होती ती सोडून गेल्याची तिनें नाकारल्याची.. आपल्या गरिबीचा अपमान केल्याची
तिच्या वरच्या प्रेमाने जागा तिरस्काराची घेतली होती..
एकदिवस तो त्याच्या अलिशान गाळीतून जात होता बाहेर जोराचा पाऊस पडत होता , गाळीच्या बाहेर बघतो तर काय एक म्हातारं जोडप एकाच छत्रीचा आधार घेवून उभ होत,, जरा जवळून बघतो तर काय हे तर तिचे आई वडील , त्यान्हा गाडीत बसण्याचा आग्रह करावं वाटत होत त्याच्या मनातील सुडाची आग जागी झाली होती...
त्यांनी आपली श्रीमंती पहावी ,गाडी बघावी, आपली प्रगती बघून त्यांच्या लेकीने जे कही केलं त्याचा पश्याताप व्हावा अस त्याला मनोमन वाटत होत..,, तिला धडा शिकवायचा होता अपमानाच्या एका वळणावर आपण आलो हे त्याला जणू लागले...
ते दोघं मात्र स्मशानभूमीकडे थकल्या वाटेने चालत होती ..हा गाडीतून उतरून त्यांच्या मागे जातो आणि ... पाहतो तर काय.. आणि ते बघून तो तेथेच कोसळतो तिचा तो फोटो आणि तोच चेहरा..कबरी जवळ ठेवलेली ती फुल जी त्यानेच मोठ्या प्रेमाने बनवून दिलेले कागदी फुल ... हा हा सून नन. झाला..
धावतच गेला कबरीकडे तिच्या आई बाबांना विचारलं काय झालं ते सांगा?? ते म्हणाले ते विदेशी कधीच नहीं नव्हती गेली रे.....
तिला कॅन्सर झाला होता .. तो झाल्याचं कडल आणि तेव्हा थोडे दिवस होते तिच्या हातात .. आपल्या जाण्याचं दुःख वाटेला येवू नये तुझ्या म्हणून प्रेमभंगाचा चटका देवून गेली ती ...
तू रागाच्या भरात जगशील स्वतःच्या पायावर उभा राहशील तिचा विश्वास होता म्हणून तिने तुला सोडले रे....
अन् तेही नाटकच होत न...
आणि ती गेली.... कायमचीच गेली ...