काळ मात्र जिंकला.....
काळ मात्र जिंकला.....
सर्वांचा लाडका सर्वांच्या मनात घर करणारे आमचे लाडके बंधू नितीन दादा कोरडे ..... कसला ही गर्व नसलेला असे हे व्यक्तिमत्व....कोणाच्याही दुःखात धावून जाणारे ... एकेदिवशी तीन मित्रासोबत बाहेर गावी लग्नासाठी निघाले ..... त्यातील एकाची ईच्छा जायची नसताना .. घरचे पण नको म्हणत होते जायला... पण काळ मात्र तिघांना ही जणू त्याच्या कडे ओढत होता..... कैलास काका , मनोज दादा आणि नितीन दादा अशे हे तिघे निघाले ....कैलास काका हे गाडी चालवत होते.. परत येत असताना काय घडले ?कसे घडले ? कही कळलेच नहीं... अचानक तिघांना हि जणू भुलच पडली... तिघे ही झोपी गेले ... ड्रायव्हर पण झोपीतच गाडी चालवत होता..भर दिवसा.. आणि सामोरे असलेल्या ट्रॅक्टर वर जावून गाडी धडकली .... गाडी पूर्ण पणें चुरा चुरा झाली.... तिथे असलेल्या अनोळखी व्यक्तीने त्या तिघांना कार मधून काढून हॉस्पिटल मधे भरती केले आणि .. पुढे उपचार चालू झाला ....त्यातील कैलास काका आणि मनोज दादा हे सुखरूप घरी आले... मात्र सर्वांचे लाडके जीवाला जीव देणारे नितीन दादा मात्र काळाशी संघर्ष करू लागले ... सर्वांच्या तोंडून एकच शब्द कही नहीं होत दादा होणार बरे ... Icu मधे जो कोणी दादा ला भेटायला जात होते... त्याचा एकच प्रश्न तुम्ही कसे आहात ??? कैलास , मनोज कसे आहेत??? स्वतःचा जीव धोक्यात असून सुद्धा दुसऱ्याची काळजी करत होता असे व्यक्तिम्त्व असणारे आमचे दादा... खूप लढला काळाशी.... काळाशी संघर्ष करून देखील आज मात्र तो काळाशी हरला... काळ मात्र जिंकला.... देवा मला हे आज पर्यंत नहीं कळले तू नेहमी चांगल्या लोकांनाच का तुझ्या कडे घेवून जातो... आज सर्व गाव त्याच्या साठी रडत आहे ..... संपती तर भरपूर आहे त्याच्या कडे पण त्याहून ही त्याने लोकांच्या प्रेमाची संपती जमा केली..... तुला थोड पण नहीं वाटल का रे त्याला आमच्या साठी राहू द्यावे म्हणून.......
आज लाखो लोक त्याच्या भेटी साठी जमा झाले.... त्याच्या साठी रडू लागले.... काळ मात्र त्याच्या जिंकायच्या आनंदात हसू लागला.... काळ मात्र अखेर जिंकलाच....