गेले ते दिवस
गेले ते दिवस
ते माझे बालपण, गेले ते दिवस
राहिल्या आठवणी.
नव्हती कुणाची चिंता मनी,
नव्हती भिडत गोष्ट काळजाला कोणती.
मनसोक्त बालपण जगत होतो,
कशाचीही विचारसरणी, काळजी
नव्हती बालपणात.
ह्यामध्ये होड्या बनवणे, विविध खेळ - खेळणे
कोणी ओरडले तर,
आजी -आजोबाच्या कुशीत जाऊन झोपायचे.
माझी आजी गोष्टी सांगून झोपवायची,
खरंच यार खूप भारी होतं,
बालपण ते बालपणच होतं.
माझे आजोबा पूर्वीच्या लोकांच्या,
गोष्टी सांगायचे, त्या गोष्टी असायच्या
म्हातारीची, तीन राण्या एक राजा...
अशी माझी आजी लहानपणी गोष्टी सांगायची.
पण एक खंत वाटते आता...
पण काय करणार, गेले ते दिवस
अन् राहिल्या त्या फक्त आणि फक्त
आठवणी