युद्ध
युद्ध
मातीसाठी खपतो आम्ही,
कुढत जगणे जमत नाही।
लढत-लढतच मरतो आम्ही,
मेलो तरीही संपत नाही।
स्वराज्याचे तोरण बांधले,
येऱ्या-गबाळ्याची संगत नाही।
मुजरा करतो फक्त राजांना,
उगाच कुणापुढेही झुकत नाही।
किती तलवारींचे वार जाहले,
तोडले तरीही तुटत नाही।
मीच मावळा, मीच मराठा,
कोथळ्याशिवाय परतत नाही ...