स्मरण विस्मरण
स्मरण विस्मरण
कधी कधी काही गोष्टी लक्षातच रहात नाही. खुप प्रयत्न करून देखील विस्मरण होतं. महत्वाच्या गोष्टी असतात. लक्षात ठेवणं भाग असतं. पण कितीदा तरी आठवता आठवता आठवत नाहित... विस्मरण होतं...कारण काहीही असू शकतं...
आणि काही प्रसंग असे असतात किती प्रयत्नशील राहून देखील विसरता येतं नाहित. काही घटना त्रासदायक असतात. काही दुःखद आठवणी असतात. सुखाचे क्षण असतात. आठवताना आनंद मिळून जातो. मन प्रफुल्लित होतं...
दुःखाच्या काही गोष्टी असतात... खुपदा प्रयत्न करून देखील स्मरणातून जात नाहीत...
आणि हे सुखद आणि दुःखद प्रसंगच आयुष्यात खुप काही शिकवून जातात...
आणि म्हणूनच कदाचित चित्रपट सृष्टीत देखील या विस्मरण यावर अनेक सुंदर गाणी झालीत.
कधी मखमली आवाजात तलत महेमूदची तर कधी मोहम्मद रफी साहेबांची आणि लता दिदिंचीजी किंवा अनेक गायक त्यांची गाणी मनात कायम घर करून गेलीत..आणि काळजाला घरं पाडून गेलीत
यादोंका सहारा ना होता
हम छोडके दुनिया चल देते.
म्हणजे आठवणींच्या आधारे जगणारी ही अनेक जण आहेत.
याद न जाए बिते दिनों की
जाकें न आए जो दिन दिल क्यूं...
विसरायचा प्रयत्न करून देखील न विसरता येणारी आठवण..
भूल जाए सारे गम और डूब जाए प्यार में. बज रही हैं धून यंही रातके सितारमें
ईथे तर आयुष्यातील दुःख विसरून प्रेमात पडून रहावसं वाटणारं गाण...
भूली हुईं यादें मुझे ईतना ना सताओ
अब चैन से रहने दो मेरे पास ना आओ
त्रासदायक आठवणींना जवळपास देखील नको आवर्जून गाणारे मुकेशजी... दर्द
मोहे भूल गए सांवरिया..
आवन कह गए अजून आए लिही न मोरी खबरिया....
हा तुम मुझें यूं भूला ना पाओगे
जब कभी भी सुनोगे गीत मेरे
स्मरण आणि विस्मरण दोन्ही चांगल्या किंवा वाईट गोष्टी क्लेशदायक आहे हेच निखालस सत्य आहे.